शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
3
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
4
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
5
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
6
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
7
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
8
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
9
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
10
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
11
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
12
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
13
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
15
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
16
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
17
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
18
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
19
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
20
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती

heatstroke:तीव्र उन्हाळ्याच्या मुक्या प्राण्यांनाही झळा, उष्माघाताने ठाण्यात दोन श्वानांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 5:55 AM

Thane News: तापमानाच्या वाढत्या पाऱ्याचा तडाखा प्राणी, पक्ष्यांनाही बसला आहे. उन्हाच्या त्रासामुळे ठाणेकरांची  दवाखान्यांत जशी गर्दी दिसून येत आहे तसेच प्राणी, पक्ष्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : तापमानाच्या वाढत्या पाऱ्याचा तडाखा प्राणी, पक्ष्यांनाही बसला आहे. उन्हाच्या त्रासामुळे ठाणेकरांची  दवाखान्यांत जशी गर्दी दिसून येत आहे तसेच प्राणी, पक्ष्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे.

१५ दिवसांत १७ पक्ष्यांना उष्माघाताचा फटका बसला असून, ते एसपीसीए रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत, तर कँप  फाउंडेशनला आठवड्याला ३५ आजारी पशू-पक्षी आढळत आहेत. यात मुख्यत्वे श्वान आणि मांजरींचा समावेश आहे. उष्माघातामुळे दोन श्वानांचा मृत्यूही झाल्याचे फाउंडेशनने सांगितले.

मार्च महिन्यात ठाण्यात तापमानाने चाळिशी गाठली असल्याने पक्षी व प्राण्यांना उष्माघाताचा फटका बसला. त्यांना पाणी सहज उपलब्ध होत नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या शोधत असताना पोटातील पाणी कमी होऊन त्यांना चक्कर येऊन ते बेशुद्ध पडतात. पक्ष्यांच्या पंखांना जखम होण्याचे प्रमाण अधिक असते.

१५ दिवसांत एसपीसीए रुग्णालयात १७ पक्षी उपचारासाठी दाखल झाले. यात पाच घार, पाच घुबड, चार ससाणे, दोन कावळे आणि एक कोकिळा यांचा समावेश आहे. कँप फाउंडेशनकडे ठाणे, मुलुंड, भांडुप, कळवा, भिवंडी येथून मांजर आणि श्वानांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे फोन येत आहेत.ज्यांच्या घरात पाळीव प्राणी आहेत त्यांनी उन्हामुळे त्यांचे पूर्ण केस काढले असतील तर उलट प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्यांच्या शरीराला चटके लागून त्यांना उष्माघाताचा झटका येऊ शकतो. उन्हात बाहेर पडल्याने प्राणी बेशुद्ध पडल्याच्या दोन घटना घडल्याचे फाउंडेशनचे सुशांक तोमर यांनी सांगितले. रस्त्यांत जाताना सुद्धा एखादा पक्षी आजारी दिसल्यास नागरिकांनी फाउंडेशनला कळवावे, असे आवाहन केले आहे.प्राणी, पक्ष्यांसाठी हे अवश्य कराप्राणी, पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवावे. प्राण्यांना सावलीत जागा द्यावी. त्यांची विशेष काळजी घ्यावी.गेल्या १५ मार्चपासून उन्हाचा तडाखा वाढल्यापासून पक्ष्यांचे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.  त्यांना सलाईनद्वारे, तोंडावाटे औषधे दिले जात आहे. जखमींचे ड्रेसिंग केले जात आहे. - डॉ. सुहास राणे, एसपीसीए रुग्णालय

कँप फाउंडेशनकडे दिवसाला चार ते पाच म्हणजेच आठवड्याला ३५ फोन येत आहेत. यात पाणी न मिळाल्याने दोन श्वानांचा मृत्यू झाला आहे. उन्हाळा वाढल्याने पाळीव प्राण्यांना बाहेर काढू नये. ठिकठिकाणी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि त्यांना सावलीत बसण्यासाठी जागा द्यावी.- सुशांक तोमर, कँप फाउंडेशन.

टॅग्स :weatherहवामानthaneठाणे