शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

दोन लाख १२ हजार रोपांची लागवड

By admin | Published: July 02, 2017 5:59 AM

राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ठाणे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार २ लाख १२ हजार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ठाणे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार २ लाख १२ हजार इतकी रोपे लावण्यात आली आहेत. वन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर सर्व शासकीय विभागांनी मिळून केलेले हे वृक्षारोपण आहे, अशी माहिती उपमुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.जिल्ह्यातील मुख्य समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर, आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऐरोली येथे झाला. तर, मुंब्रा बायपास रोडवरील खारिवलीदेवी मंदिराच्या पायथ्याशी कदंब वृक्षाचे रोपटे लावून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात या योजनेचा शुभारंभ केला. या वेळी आमदार सुभाष भोईर, रवींद्र फाटक, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाभरात यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कृषी दिनानिमित्त शनिवारी गृह विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांच्या हस्ते ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी २०० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली. प्रसंगी कारागृह अधीक्षक नितीन वायचळ उपस्थित होते. तसेच, सिंह यांनी कारागृहातील कारखाना, बेकरी, शिवणकाम, महिला विभाग आदी विभागांना भेट देऊन कारागृहाची पाहणी केली. ५० हजार झाडे लावणारकल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत महापालिका या मोहिमेंतर्गत आठवडाभरात ५० हजार वृक्षांची लागवड करणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ वृक्षदिंडी काढून करण्यात आला. या वेळी सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. वृक्षदिंडीला महापौर राजेंद्र देवळेकर यांनी नारळ फोडून दिंडीचा शुभारंभ केला. रोटरी क्लब, औद्योगिक विभाग, टिळकनगर विद्यालय, धडपड व्यासपीठ व कल्याण-डोंबिवली महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग यांच्यातर्फे ही दिंडी काढण्यात आली. त्यात वृक्षप्रेमी नागरिक व डोंबिवली विभागातील २५ शाळांनी सहभाग घेतला होता. दिंडीचा समारोप एमआयडीसीतील ज्ञानमंदिर शाळेजवळ झाला. कसाऱ्यात वृक्षदिंडीकसारा : कसाऱ्यातील शेठ बा.ह. अग्रवाल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा तायडे- हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.नारायणगावात उपक्रमशेणवा : मळेगाव ग्रुपग्रामपंचायतीच्या वतीने नारायणगावात वृक्षलागवड करण्यात आली, या वेळी सरपंच दीक्षा पडवळ, उपसरपंच अमृता वरकुटे, सदस्य वैभव पडवळ, विलास वरकुटे, ग्रामसेवक एच. खाडे, शिपाई कैलास शिर्के, सोमनाथ शिर्के यांच्यासह गावकरी उपस्थित होते. येथील संघर्ष पत्रकार सेवाभावी संघाच्या वतीने वेलोशी येथे वृक्षलागवड करण्यात आली.४४ हजार झाडांचे लक्ष्यअनगाव : भिवंडी तालुका व पडघा वन विभागाच्या वतीने शनिवारी १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. तालुक्यात १२० ग्रामपंचायतींत ४४ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी हनुमंत दोडके यांनी दिली.मानवेल बांबूंची लागवडशहापूर : शहापूर वन विभागामार्फत वनप्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते मानवेल जातीच्या बांबूंची लागवड करून वृक्षारोपण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी माजी आमदार दौलत दरोडा, तहसीलदार रवींद्र बावीस्कर, पोलीस उपअधीक्षक विशाल ठाकूर, भाजपाचे अशोक इरनक, काशिनाथ भाकरे, शहापूरचे उपवनसंरक्षक डी.पी. निकम, वनप्रशिक्षण संस्थेचे संचालक चंद्रकांत भारमल, सहायक उपवनसंरक्षक एस.पी. चव्हाण, वनक्षेत्रपाल एन. जी. कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.लग्नाआधी वृक्षारोपण : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे पुतणे संग्राम तावडे आणि नववधू प्राजक्ता जोशी यांनी मात्र लग्नाचे सात फेरे घेण्याआधी वृक्षारोपण करून नवीन पिढीला अनोखा संदेश दिला. विनोद तावडे यांच्या उपस्थितीत संग्राम तावडे आणि त्यांची पत्नी प्राजक्ता जोशी यांनी लग्नाच्याच हॉलमध्ये सकाळी लवकर येऊन वृक्षारोपण केले.