शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

अंबरनाथमध्ये कार अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

By पंकज पाटील | Updated: October 18, 2023 18:00 IST

याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

पंकज पाटील, अंबरनाथ: मंगळवारी मध्यरात्री एका भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कारला भीषण अपघात घडला असून या अपघातात उल्हासनगरच्या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

कल्याण - बदलापूर राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान मानव थारवाणी आणि कौशल थारवाणी हे दोघे मित्र आपल्या खाजगी कारमधून अंबरनाथच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना त्यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे या गाडीने रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की संपूर्ण कार या धडके चेपली गेली. कारचा चालक मानव आणि त्याच्या शेजारी बसलेला कौशल या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही तरुणांचे मृतदेह कारमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर अनेक 'डेथ स्पॉट' अजूनही तसेच सोडून देण्यात आल्याने अनेक अपघात घडत आहेत. त्यातच मंगळवारी मध्यरात्री घडलेला अपघात हा दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याने कल्याण बदलापूर राज्य महामार्गाच्या सुरक्षा बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथAccidentअपघात