शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उल्हासनगर होणार अधिकृत शहर- आमदार कुमार आयलानी

By सदानंद नाईक | Updated: March 15, 2024 22:18 IST

महायुतीच्या नेत्यांचा जल्लोष

उल्हासनगर: अनधिकृत शहराचा शिक्का बसलेले उल्हासनगर शासनाच्या नव्या अध्यादेशाने अधिकृत शहर होणार असल्याची महिती शुक्रवारी महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार कुमार आयलानी यांनी दिली. यावेळी स्थानिक नेत्यांनी एकमेकांना पेढे भरून जल्लोष केला आहे.

 उल्हासनगर म्हणजे अवैध बांधकामाचे अनधिकृत शहर असा शिक्का बसला आहे. निर्वासितांचे शहर म्हणून शासनाने सन-२००६ साली खास उल्हासनगर साठी बांधकामे नियमित करण्याचा विशेष अध्यादेश काढला. मात्र जाचक अटी शर्ती व दंडात्मक रक्कम जास्त असल्याने, नागरिकांनी अध्यादेशाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया जवळजवळ ठप्प पडली होती. दरम्यान धोकादायक इमारती पडण्याचे सत्र सुरू होऊन अनेकांचे जीव जाऊन शेकडो जण जखमी झाले. तर हजारो नागरिक बेघर झाले. अखेर शासनाने काढलेल्या अध्यादेशात बदल करून धोकादायक इमारत पुनर्बांधणीचा समावेश करण्यात आला. मात्र त्यानंतरही त्रुटी राहिल्याने, नागरिकांनी नेहमीप्रमाणे प्रतिसाद दिला नाही. अखेर लोकसभा निवडणुक आचारसंहिता पूर्वी शासनाने बांधकामे नियमित करण्याबाबत जीआर काढून शहरवासीयांना सुखद धक्का दिला आहे. 

शहरातील शासकीय जागेवरील तब्बल २७ हजार अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी गुरवारी शासनाने नव्याने जीआर काढला. अनधिकृत बांधकामाच्या १० टक्के भोगवटा शुल्क भरून बांधकामे नियमित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेऊन त्याबाबत जीआर काढला. तसेच शेकडो धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणी बाबत सवलत देऊन चटईक्षेत्र वाढविण्यात आले. अशी माहिती महायुतीच्या नेत्यांनी आमदार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिली. पत्रकार परिषदेला आमदार कुमार आयलानी, भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी, लाल पंजाबी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, शहरप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हासंघटक नाना बागुल, रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री आदीजन उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमेकाला पेढे भरून बांधकामे नियमित होत असल्याचे सांगून जल्लोष केला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर