शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

कल्याण-मुरबाड रोडवरील पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:44 AM

कल्याण : कल्याण-मुरबाड रोडवरील कांबा, पाचवा मैल, नवथरपाडा, वाघेरापाडा, पावशेपाडा या पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांचे ...

कल्याण : कल्याण-मुरबाड रोडवरील कांबा, पाचवा मैल, नवथरपाडा, वाघेरापाडा, पावशेपाडा या पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा करावा, याकडे उल्हास नदी बचाव समितीने लक्ष वेधले आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत कृती आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत दिले आहेत. पाणी आणि स्वच्छता मिशनची ही दुसरी बैठक होती. जलजीवन मिशन हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी उद्दिष्ट आखून दिले आहे. कोरोनाची साथ आणि पावसाळा यामुळे उद्दिष्टपूर्तीस विलंब होत आहे. या बैठकीच्या धर्तीवर उल्हास नदी बचाव समितीने कल्याण-मुरबाड रोडवरील पाच गावांना जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. या गावांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रकल्पाचे काम लवकर मार्गी लावा

विशेष म्हणजे उल्हास नदी बारमाही जलस्त्रोत आहे. या नदीतून अनेक लोक पाणी उचलतात. मात्र, या नदीत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. तेच पाणी प्रक्रियेविना संबंधित गावपाड्यांतील रहिवासी पीत आहेत. या ठिकाणी एक जलशुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, तो पूर्णत्वास आलेला नाही. त्याचे काम लवकर मार्गी लावावे, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. समिती गेल्या अनेक वर्षांपासून नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

---------------------