शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

उत्तन - पाली येथील वाहतुक कोंडी व रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 8:03 PM

बसस्थानकावर रिक्षा उब्या केल्या जात असल्याने बस भर रस्त्यात उभी करावी लागतेय.

मीरारोड - उत्तन नाका पासुन पाली पर्यंतचा रस्ता अतिक्रमण व बेकायदा पार्किंगच्या विळख्यात सापडला असुन यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी होत असल्याने परिसरातील चर्च समिती मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांच्या तक्रारी वरुन आज पोलीस, महापालिका व नगरसेवकांनी संयुक्त पाहणी करुन तातडीने कारवाईची ग्वाही दिली आहे.

भाईंदरच्या उत्तन नाका पर्यंतचा रस्ता नुकताच जुनी दुकाने - घरं तोडुन रुंद करण्यात आला. परंतु या रुंदिकरणा नंतर देखील येथे बेकरी वाल्याची लाकडं तर अन्य लोकांचे सामान भर रस्त्यातच ठेवले जात आहे. शिवाय रस्त्या लगत बेकायदा पार्किंग केली जात आहे. उत्तन नाका येथे तर महापालिकेच्या बस स्थानकालाच रिक्षा चालकांनी विळखा घातला आहे. बसस्थानकावर रिक्षा उब्या केल्या जात असल्याने बस भर रस्त्यात उभी करावी लागतेय. शिवाय नाक्यावर असणाराया टराया, हातगाड्या व दुचाकी , रिक्षा आदिंची मनमानी पार्किंग मुळे मोठी वाहतुक कोंडी होते.

उत्तन नाका पासुन मार्केट पर्यंत देखील वाढिव बांधकामे, पत्राशेड, टपरायांचे अतिक्रमण मोठे आहे. शिवाय दुचाकी, रिक्षा व अवजड मोठया वाहनांची पार्किंग बेकायदा होऊन रहदारी व वाहतुकीला अडथळा होत आहे. येथील पालिकेची मंडई असुन सुध्दा बाहेरच्या बाजुला मोठ्या प्रमाणात हातगाड्या, भाजी - फळवाल्यांच्या गाड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे येथे सुध्दा नेहमीच कोंडी होते. पुढे करईपाडा पर्यंत देखील बेकायदा दुकाने खाडित भराव करुन बांधली असुन तेथे देखील रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठी वाहने रस्ता अडवुन उभी केली जातात.

सततच्या बेशिस्त व बेकायदा पार्किग तसेच अतिक्रमण व हातगाड्या आदिं मुळे वाहतुक कोंडी कायमची झालेली आहे. शाळकरी मुलं, महिला, नागिरकांना चालण्यासाठी येथे पदपथ व रस्ताच उरत नाही. वाहतुक कोंडीत अडकुन पडल्याने शाळेत वा कामाला जायला नेहमीच उशीर होतो. रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन सुध्दा यायला - जायला अडथळा होतो. यामुळे ध्वनी आणि वायु प्रदुषण प्रचंड वाढले आहे असा संताप येथील नागरिकां मध्ये आहे.

परंतु कार्यवाही होत नसल्याने चर्च समिती मधील सामाजिक शाखेच्या ल्युसी परेरा, पिंकी मिरांडा, अस्टेलिनिया तान्या, विल्यम सांबराया, जॅरोम रॉड्रिक्स, गोरेटी डोंगरकर, कॅरल मुनिस, वेलेन्सीया मारवी, सिंड्रेला मुनिस, वेलेन्सीया मेंडोन्सा, राल्फ डिसोझा, आॅलिंडा बांड्या, जॉविटा तान्या, वंदना नून, शर्मिला मुनिस आदिंनी या गंभीर बनत चाललेल्या समस्ये विरोधात आक्रमक पावित्रा घेतला. या प्रकरणी त्यांनी निवेदन तयार करुन ठोस कारवाईची मागणी केली.

सामाजिक शाखेच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी वरुन आज बुधवारी ठाणे ग्रामीण पोलीस वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार, उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सतिश निकम, प्रभाग अधिकारी सुनिल यादव सह सभापती विनोद म्हात्रे, स्थानिक नगरसेवक हेलन गोविंद, शर्मिला बगाजी व एलायस बांड्या आदिंनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक नागरिकांनी देखील वाहतुक कोंडी बद्दल आपले अनुभव सांगत कठोर कारवाईची मागणी केली.

या प्रकरणी महापालिका आणि पोलीसांनी बेकायदा पार्किंग, अतिक्रमण, हातगाड्या, वाढिव बांधकामे तसेच रिक्षा व अवजड वाहनांवर सातत्याने कारवाईचे आश्वासन दिले. या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यासह वाहतुक पोलीस तसेच ट्रॅफिक वॉर्डन ची नियुक्ती आणि उत्तन पोलीसां कडुन सततची कारवाई करण्याची ग्वाही दिली गेली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस