शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

अंबरनाथमधील वालधुनी झाली गुलाबी नदी; प्रदूषण कमी होण्याची चिन्हेच नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 7:20 AM

अंबरनाथमधून वाहणारी वालधुनी नदी गेल्या काही वर्षात सर्वाधिक प्रदूषित नदीत समाविष्ट झाली आहे. गेल्या वर्षी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मदतीने नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प राबवला होता.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीचे प्रदूषण कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. सर्व सांडपाणी  नदीत सोडले जात असतानाच सोमवारी दुपारी अचानक वालधुनी नदीतील पाणी गुलाबी झाले होते. 

अंबरनाथमधून वाहणारी वालधुनी नदी गेल्या काही वर्षात सर्वाधिक प्रदूषित नदीत समाविष्ट झाली आहे. गेल्या वर्षी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मदतीने नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प राबवला होता. मात्र तरीदेखील नदीचे प्रदूषण कमी झाले नाही. अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीतील काही कारखान्यांनी सर्व सांडपाणी या नदीत सोडल्याने आजही  नदी प्रदूषितच आहे. यासोबतच अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील काही जीन्स कंपन्या थेट त्यांचे सांडपाणी नदी सोडत असल्याने या नदीचे रंगदेखील बदलत आहे. सोमवारी दुपारी वालधुनी नदीने गुलाबी रंग परिधान केला होता. संपूर्ण पाणी गुलाबी रंगाचे वाहत राहिल्याने प्रदूषणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. सांडपाणी, रासायनिक पाणी आणि अनेक जीन्स वॉश करणारे कारखानदारदेखील सर्व सांडपाणी वालधुनी नदीत सोडत असल्यामुळे या नदीच्या पाण्याचा रंग बदलत आहे.

वालधुनी नदीचे प्रदूषण सर्वज्ञात असतानादेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडे उघडपणे डोळेझाक करीत आहे. वालधुनी नदी प्रदूषित होण्यामागे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सर्वांत मोठा हात राहिला आहे - शैलेश शिर्के,  सामाजिक कार्यकर्ते