शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे पूल पुन्हा अवजड वाहनांसाठी राहणार बंद; १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दुरुस्तीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 10:45 IST

याआधी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पहिली अधिसूचना काढून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती.

पारोळ/मीरा रोड : भाईंदर खाडीवरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. या काळात १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान खाडीपूल अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या काळात हलक्या वाहनांना पुलावरून एन्ट्री असली तरी या वाहनांसाठी केवळ एकच मार्गिका खुली असणार आहे. पुलाचे काम सलग तीन दिवस चालणार असल्याने येणाऱ्या तीन दिवसांत मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

भाईंदर खाडीपूल हा तसा जुना झाला आहे. मध्यंतरी या पुलाच्या एका बाजूच्या गर्डरला तडे गेल्याने मोठ्या कालावधीसाठी पूल दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात आला होता, मात्र त्यानंतरही अधूनमधून या पुलाचे काम निघतच आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून याआधी हाती घेण्यात आले होते, मात्र ठाण्यातील वाहतूककोंडीचा जटिल तिढा समोर आल्याने पुलाचे काम करण्यासाठी काढण्यात आलेली अधिसूचना महामार्ग प्राधिकरणला दोन वेळा रद्द करावी लागली आहे.

याआधी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पहिली अधिसूचना काढून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवल्याने ही अधिसूचना रद्द करावी लागली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान पुन्हा पूल बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र पुन्हा ही अधिसूचना रद्द करावी लागली. आता १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ही अधिसूचना काढून पुलाचे काम अखेर हाती घेण्यात आले आहे. तीन दिवसांच्या काळात पुलाचे काम हाती घेण्यात आले असल्याने अवजड वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पर्यायी मार्गावर  वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवणार आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकroad transportरस्ते वाहतूक