शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

मतदारांची पळवापळवी हा आचारसंहितेचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मुरबाड : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची (टीडीसीसी) निवडणूक जर लोकशाही मार्गाने होत असेल तर मतदारांची पळवापळवी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुरबाड : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची (टीडीसीसी) निवडणूक जर लोकशाही मार्गाने होत असेल तर मतदारांची पळवापळवी करणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे, असे मत टीडीसीसीचे माजी अध्यक्ष उल्हास बांगर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. कोणत्याही निवडणुकीत आचारसंहिता महत्त्वाची असते, असे ते म्हणाले.

टीडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी मंगळवारी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदारांची पळवापळवी करण्यात आली असून, ‘लोकमत’ने रविवारी याबाबतचे दिलेले वृत्त खरे असल्याचे बांगर म्हणाले. मुरबाड तालुक्यात ७० मतदार असून, आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न केला असता बहुतेक मतदार हे आपल्या घरी आढळून आले नाहीत. त्यामुळे या मतदारांची पळवापळवीबाबत ते म्हणाले, की मतदारांना पळवून अनोळखी स्थळी ठेवणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे.

टीडीसीने मागील दोन पंचवार्षिकमध्ये नागरिकांसाठी अल्पदरात गृहकर्ज योजना, तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योगधंद्यांना लागणारे बीज भांडवल, महिलांचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना, तसेच ठेवीदारांसाठी आकर्षक योजना, असे विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे बँक नाबार्डकडून पारितोषिक मिळविण्यात यशस्वी ठरली. वैकुंठभाई मेहता हा जिल्हास्तरावरील बँकांना मिळणारा पुरस्कार मिळविण्यास वेळोवेळी पात्र ठरली असल्याने या बँकेच्या संचालक मंडळावर कोणाला विराजमान करावे, हे मतदारांना चांगले समजते. त्यामुळे ते योग्य उमेदवाराला मतदान करतील. परिणामी, मतदार पळवून काहीच उपयोग होणार नाही, असे मत बांगर यांनी व्यक्त केले.

-------------------------