शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
4
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
5
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
6
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
7
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
8
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
9
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
10
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
11
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
12
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
13
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
14
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
15
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
16
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
17
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
18
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
19
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
20
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

विसर्जन करणा-यांना हवे जॅकेट, ठोस मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:56 AM

पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरांमधील कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा कल वाढत आहे.

बिर्लागेट : पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरांमधील कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे विसर्जनस्थळी होणारे अपघातही घटले आहेत. मात्र, शहरांतील नैसर्गिक तलाव, सार्वजनिक विहिरी, खाडीकिनारी येथे आजही कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातून तरुण विसर्जन करण्यासाठी येतात. प्रशासनाकडून त्यांना जीवरक्षक जॅकेट, विमा कवच अथवा मानधनही मिळत नाही. या सुविधा पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे.गणेशोत्सव काळातील होणारे जल व ध्वनि प्रदूषण टाळण्याठी केडीएमसी व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. विसर्जनासाठी केडीएमसीने महापालिका हद्दीत कृत्रिम तलाव आणि प्लस्टिकच्या टाक्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात या तलावांमध्ये विसर्जन झाले. विसर्जनासाठी येथे वीजपुरवठ्या जनरेटर व्हॅन, पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दलाचे जवान, गोताखोर तसेच भाविकांना आरती करण्यासाठी मंडपात टेबलची व्यवस्थाही करून दिली जात आहे. मात्र, नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी या सुविधा असल्या तरी विसर्जन करणारे तरुण जीव धोक्यात घालून गणेशमूर्तींचे विसर्जन करत आहेत.कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागांत म्हारळ, वरप, कांबा गावांतील पाचवामैल, रायता, आपटी चोण येथील संगम, आणे भिसोळ येथे उल्हास व बारवी नदीकिनारी तसेच येथील गणेश घाटावर विसर्जन केले जाते. परंतु, नद्यांच्या पातळीचा अंदाज न आल्याने अनेक गणेशभक्तांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. हे अपघात रोखण्यासाठी कल्याण तहसील कार्यालयाने नदीच्या काठावरील गावांतील पट्टीच्या पोहणाºया ८० ते १०० तरुणांची यादी तत्कालीन तहसीलदार नितीन चव्हाण यांनी तयार केली होती. त्यात रायता येथील २२, गोवेली सात , कांबा व वरप प्रत्येकी १०,म्हारळ १५, टिटवाळा दोन , गुरवली व वासुंद्री येथील प्रत्येकी एक आणि कोळीवाडा येथील १० जण आहेत.ग्रामीण भागातील आदिवासी, कोळी, कातकरी तरुण पोहण्यात तरबेज आहेत. गावातील खाडीकिनारी, तलाव तसेच अन्य जलस्त्रोतांची खोली, त्यातील खचखळगे यांची पूर्ण माहिती त्यांना असते. त्यामुळे प्रशासनातर्फे त्यांना विसर्जनासाठी बोलावले जाते. हे तरुण गणेशोत्सवात मिळणाºया या रोजगाराच्या शोधात कल्याण-डोंबिवली परिसरातही जातात. मात्र, प्रशासनाकडून लाइफ जॉकेट, ठोस मानधन किंवा विमाही उतरवला जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, यंदा प्रथमच कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने विसर्जन करणाºया कोळी तरुणांनाविमा उतरवत एक आदर्श घालून दिला आहे.दरम्यान, रायता येथील अश्वमेध प्रतिष्ठानने तहसीलदार व पोलीस प्रशासनाला विसर्जनावेळी नेहमीच सहकार्य केले आहे. संस्थेच्या सभासदांनी आपटी, रायते, गोवेली, मानिवली, वाघेरापाडा, पाचवामैल, वरप, कांबा, म्हारळ येथे विसर्जनस्थळावर प्रत्यक्ष मूर्तींचे विसर्जन, गर्दीचे नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन आदी कामे केली आहेत. अविनाश हरड, नरेश सुरोशे, तुषार पवार, सुदाम भोईर, रवींद्र सुरोशे, जगण देसले आदी तरु णांनी विसर्जनाच्या काळात बुडणाºयांचे जीव वाचवले. त्याची दखल तत्कालीन पोलीस अधीक्षक अर्चना त्यागी यांनी घेत या तरु णांचा सन्मान केला होता. परंतु, सध्या विसर्जनावेळी पोलिसांना विविध सामाजिक संस्था मदत करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव