शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

उन्हाचा पारा जोरात तरी वऱ्हाडी जोषात

By admin | Published: May 11, 2015 1:26 AM

यंदा संपुर्ण महाराष्ट्रात तापमानाने कमाल र्मयादा गाठली आहे. गेली पंधरा दिवसांपासून उष्मा जास्त वाढल्याने गरमी व उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.

उमेश जाधव, टिटवाळायंदा संपुर्ण महाराष्ट्रात तापमानाने कमाल र्मयादा गाठली आहे. गेली पंधरा दिवसांपासून उष्मा जास्त वाढल्याने गरमी व उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. असे असले तरी लग्नसराईत वर-वधुच्या हळदी समारंभ व मिरवणुकीत रात्रभर व दिवसा उन्हात डिजेच्या व बॅण्डच्या तालावर ताल धरत बेधुंद नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचे चित्र कल्याणच्या शहरी भागासह ग्रामीण भागात पहावयास मिळते. त्यामुळे निसर्गाच्या वातावरणातील बदलत्या उष्माघातावर मात करत वऱ्हाडी मंडळी बेधुंद होऊन नृत्य करून हाळदी व लग्न समारंभाचा आनंद लुटत आहेत.लग्नसमारंभ म्हटलं की वधु- वराकडच्या मंडळींची मोठी धावपळ सुरू आसते. यंदा लग्नकार्यासाठी मार्च महिन्यात फक्त ५ , एप्रिलमध्ये ४, मेमध्ये १० आणि जून महिन्यात अवघे ६ मुहूर्त आहेत, तेसुद्धा १२ जूनपर्यंत. पुढे १७ जूनपासून अधिक मास सुरू होत आहे. तेव्हा मार्च मिहना वगळता येत्या तीन महिन्यांत लग्नकार्यासाठी फक्त २० मुहूर्त आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या मुहूर्तांवर लग्नकार्य उरकण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू असल्याचे दिसते. अशा लग्न व हळदीसमारंभा करिता नातेवाईक अर्थात वऱ्हाडी आणि स्नेही हे आवर्जून आपली हजेरी लावत असतात. त्यामुळे हळदी व लग्नकार्यात आनंदाला उधाण आलेले असते. लग्नकार्यात इतर सर्व धार्मिक विधींसह हळदी समारंभाला विशेष महत्त्व असते. यावेळी रात्रभर डिजे व बँण्डच्या तालावर बेधुंद होऊन नाचण्याचा आनंद लुटणारी वऱ्हाडी मंडळी पहावयास मिळते.दुपारी १२ वाजेनंतरचा उन्हाचा तडाखा तर सहनच होत नाही. असे असले तरी कल्याणशहरासह ग्रामीण व संपूर्ण जिल्हयÞात अशा वातावरणात देखील गावागावात व शहरात सोसायटींमध्ये रोज शेकडो लग्न सोहळे साजरे होत आहेत या सोहळ्याच्या हाळदी समारंभात घामाघुम होऊन नाचणारी वऱ्हाडी पहावयास मिळते. या वऱ्हाडींपुढे तापमानाचाही पारा फिका पडला आहे की काय, अशी शंका निर्माण होते.