शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

पाणीचोरांना अभय, करदात्यांना भुर्दंड का?

By admin | Published: February 16, 2017 2:01 AM

केडीएमसी हद्दीत पाण्याच्या हजारो बेकायदा जोडण्या आहेत. त्या शोधून दोषींवर कारवाई करण्याऐवजी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या

कल्याण : केडीएमसी हद्दीत पाण्याच्या हजारो बेकायदा जोडण्या आहेत. त्या शोधून दोषींवर कारवाई करण्याऐवजी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांच्या माथी कर आणि दरवाढ मारण्याची प्रशासनाची भूमिका चुकीची आहे, असे सुनावत स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी, करदरवाढीचा प्रस्ताव बुधवारच्या विशेष सभेत फेटाळून लावला. दरम्यान, मंगळवारीच म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणतीही करदरवाढ करणार नाही, अशी घोषणा केली होती. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापालिका प्रशासनाने अग्निशमन करात दीड टक्का, तर पाण्याच्या दरात वाढ सुचवली होती. पाणीपुरवठा विभागातील आस्थापना खर्च, विद्युतदेयके, देखभालदुरुस्तीचा खर्च, रसायनांचा खर्च, पाण्याची रॉयल्टी आदी खर्चांत दरवर्षी होणारी वाढ, त्यात महापालिकेने जेएनएनयूआरएम योजनेसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले होते. त्याचबरोबर अग्निशमन दल सक्षमीकरणाचे कारण पुढे करीत दीड टक्क्याने करात वाढ करण्याचा प्रस्तावही बुधवारच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला. परंतु, करदरवाढीच्या प्रस्तावावर मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांच्या निवडणुकांचे सावट होते. हे प्रस्ताव मंजूर झाल्यास वेगळा संदेश जाण्याची शक्यता असल्याने तूर्तास ते स्थगित ठेवले जाण्याची दाट शक्यता होती. त्यातच, मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हात्रे यांनी करदरवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. स्थायीच्या सभेला बुधवारी सुरुवात होताच अन्य महापालिकांच्या तुलनेत केडीएमसीत कर अधिक असल्याचे सर्वच सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. या जाचक करामुळे चोरवाटा शोधल्या जात असल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)