शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

गळतीचे प्रमाण वाढल्याने पाणी कपात; ठाण्यातील महत्वाच्या शहरातील नागरिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:39 AM

-पंकज पाटील अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या दोन्ही ...

-पंकज पाटील

अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या दोन्ही शहरांवर पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मागील आठ ते १० वर्षांपासून पाणी गळतीचे प्रमाण कमी करण्यास जीवन प्राधिकरणाला अपयश आले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहराला मिळून ११० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासत आहे. त्यातील ९५ दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीच्या बॅरेज धरणातून उचलण्यात येत आहे, तर उर्वरित १५ एमएलडी पाणी एमआयडीसीमार्फत अंबरनाथला पुरवण्यात येत आहे. दोन्ही शहरांना पाणी पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. पाणीपुरवठ्याची योजना सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र, जुन्या जलवाहिन्या तसाच ठेवल्याने पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे.

मागील दोन ते तीन वर्षांत अंबरनाथची पाण्याची गरज वाढली असून, पुरेसे पाणी अद्यापही या दोन्ही शहरांना उपलब्ध झाले नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी जीवन प्राधिकरणाला पाण्याची गळती रोखणे गरजेचे आहे. मात्र, ते रोखण्यात अपयश आल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरावर पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. शहरातील पाणीटंचाईला केवळ पाणी चोरीच जबाबदार नसून, जीवन प्राधिकरणाचे चुकलेले नियोजन हे देखील महत्त्वाचे कारण आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनामार्फत टँकरची कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

या भागांतील नागरिकांच्या तोंडचे पळाले पाणी

- अंबरनाथच्या महेंद्र नगर, फुले नगर, कमलाकर नगर, नालंदा नगर, बुवापाडा, मोरीवली पाडा आणि गांधी नगर या भागांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

- बदलापूरमध्ये कात्रपगाव, शिरगाव, खरवाई, बदलापूर गाव या भागांमध्ये टंचाई आहे. या भागातील पाणीटंचाईमुळे खासगी टँकर मालक या टंचाईचा फायदा उचलताना दिसत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातthaneठाणेambernathअंबरनाथbadlapurबदलापूर