शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मे मध्ये तोडणार उद्योगांचे पाणी!

By admin | Published: March 05, 2016 1:34 AM

पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी लगेचच कारखान्यांचे पाणी तोडण्याचे आदेश एमआयडीसीला नाहीत. मात्र मे महिन्याच्या मध्यापर्यंत टंचाई तीव्र झाली

सुरेश लोखंडे,  ठाणेपिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी लगेचच कारखान्यांचे पाणी तोडण्याचे आदेश एमआयडीसीला नाहीत. मात्र मे महिन्याच्या मध्यापर्यंत टंचाई तीव्र झाली, तर मात्र उद्योगांचे पाणी टप्प्याटप्प्याने तोडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र त्याबाबतचा निर्णय जिल्ह्याच्या पाण्याचे नियोजन करण्याबाबत लवकरच होणाऱ्या पुढील बैठकीत घेतला जाणार आहे. सध्या राज्याचे मंत्रिमंडळ टंचाईग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ते दौरे आटोपले की ठाण्याची बैठक होईल, असा अंदाज आहे. त्या बैठकीत प्रत्येक शहराचा नवा कोटा ठरवण्यात येणार आहे. तोवर लघू पाटबंधारे खात्याने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार प्रत्येकाला पाणी उचलावे लागणार आहे. सध्या पाणीटंचाई ४५ टक्क्यांवर गेलेली असली तरी प्रत्यक्षात ती ६५ टक्के करण्याचे नियोजन आहे. सध्या पाणीबंद आणि इतर दिवशी कमी दाबाने पाणी पुरवत साधारण ५० टक्के कपात सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, पाण्याचा ठरवून दिलेला कोटा आणि प्रत्यक्षात जादा उचललेले पाणी याबाबतची माहिती उघड झाल्याने लघू पाटबंधारे विभाग कोणत्याही क्षणी पाणीबंद करण्याची (यंत्रणा सील करण्याची) कारवाई करू शकेल, या भीतीपोटी एमआयडीसीचे अधिकारी त्यांना ठरवून दिलेली कपात मान्य करण्यास तयार झाल्याचे कळते. उपलब्ध पाणी साठ्यातून १५ जुलैपर्यंत पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या लघू पाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार आठवड्यातून ४० टक्के पाणी कपातीसह रोजच्या पाणी पुरवठ्यातही २५ टक्के कपातीचे धोरण आम्ही अंमलात आणल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश लोणकर यांनी सांगितले. आठवड्यातून ५० टक्के पाणी कपात लागू करण्याचे एमआयडीसीने मान्य केले आहे. सध्या कारखान्यांचे पाणी तोडण्याचे आदेश आम्हाला नाहीत. पण पिण्याच्या पाण्याला प्राधान्यक्रम देऊन कारखान्यांचे पाणी देखील आदेश येताच बंद करण्यास एमआयडीसीने सहमती दर्शवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘एमआयडीसीनेच चोरले पाणी?’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर त्यांनी कपातीचे सूत्र स्वीकारल्याची भूमिका मांडली. उद्योगांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्यातील ८० टक्के हे कारखान्यांतील कामगारांना पिण्यासाठी आणि २० टक्के कारखान्यांसाठी दिले जाते. त्यातील पिण्याच्या पाण्यात कपात करून आधी मार्ग काढला जाईल. नंतर गरजेनुसार उद्योगांचे पाणी तोडले जाईल, असा तोडगाही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांपुढे आहे.