शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
2
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
3
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
5
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
6
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
8
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
9
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
10
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
11
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
12
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
13
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
14
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
15
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
16
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
17
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
18
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
19
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
20
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

सोनारपाड्यात दोन दिवसांतून एकदा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:43 AM

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांना चार-पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थ हैराण झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांना चार-पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कमी दाबामुळे दोन दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने त्रस्त असलेल्या सोनारपाडा येथील साईधाम सोसायटीतील ९५ कुटुंबीयांना गुरुवारी केडीएमसीच्या डोंबिवलीतील ‘इ’ प्रभाग कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला.

सोनारपाडा परिसरात केडीएमसीची बेकायदा नळजोडण्या तपासणी मोहीम सुरू होती. आधीच कमी दाबाने पाणी येत असल्याने या मोहिमेला साईधाम सोसायटीने विरोध केला. तसेच पाणीप्रश्न मनप सोडवू शकत नाही, मग अशा मोहिमेचा जनतेला काय फायदा असा जाब विचारला. त्यानंतर नागरिकांनी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी पाणीपट्टी घेता; मग पाणी प्रश्न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा रहिवाशांनी दिला. तर, यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या मनसैनिकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तर, सोनारपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुकेश पाटील यांनी जनतेचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.

दरम्यान, काही वेळाने मोर्चेकरी आपल्या घरी गेल्यावर त्यांच्या इमारतीजवळ मनपाचे कर्मचारी अनधिकृत नळजोडण्या तपासणीसाठी आले होते. कर्मचाऱ्यांनी या इमारतीची एक नळजोडणी तोडली. याचा राग आल्याने येथील रहिवासी संतप्त झाले होते. या मोहिमेला विरोध करत आधी नोटीस द्या, मग तापसणी करा, अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले. वातावरण तापू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी तोडलेली नळजोडणी पुन्हा पूर्ववत करून दिली.

याबाबत पाणीपुरवठा उपअभियंता अनंत मतगुंडी यांना विचारले असता ते म्हणाले, एमआयडीसीकडूनच कमी दाबाने पाणीपुवठा केला जात आहे. प्रशासन याकडे लक्ष देऊन नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून काळजी घेणार आहे.

----------------