शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उल्हासनगरात जलवाहिनीला गळती, लाखो लिटर पाणी नाल्यात 

By सदानंद नाईक | Updated: March 21, 2025 18:43 IST

शहरांत भुयारी गटार, रस्ते बांधणी, पाणी पुरावठा योजना यासह अन्य विकास कामे सुरु असून रस्ते खोदले जात असल्याने, जलवाहिन्या फुटल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

-सदानंद नाईक, उल्हासनगर उल्हासनगर शहरात एकीकडे पाणीटंचाई निर्माण झाली असताना, दुसरीकडे जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नेताजी गार्डन जवळ गेल्या चार दिवसांपासून जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी दुरस्ती अभावी वाहून जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उल्हासनगर महापालिका पाणी पुरवठा विभागातील अपुऱ्या कर्मचाऱ्या अभावी विकास कामावेळी फुटलेल्या जलवाहिन्या दुरस्ती केल्या जात नाहीत. या जलवाहिन्यातून लाखो लिटर पाणी खाली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. 

जलवाहिनी कुठे फुटली आहे? 

कॅम्प नं-५, नेताजी गार्डन परिसरात जलवाहिनी फुटून गेल्या चार दिवसापासून लाखो लिटर पाणी नालीत जात आहे. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. तर दुसरीकडे शहरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली. 

सुभाषटेकडी येथील महिला व नागरिकांनी एकत्र येत महापालिकेचा निषेध करून मातीचे मडके फोडले. संतोषनगर, तानाजीनगर परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, स्थानिक नागरिकांनी महापालिकेला निवेदन देत आंदोलनाची भूमिका घेतली.

जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती, पाणीपुरवठा बंद

एमआयडीसीचे म्हारळ गाव शहाड गावाठाण येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरस्तीचे काम शुक्रवारी काढल्याने, दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे. असे महापालिकेकडून सांगण्यात आले. 

शहरांत भुयारी गटार, रस्ते बांधणी, पाणी पुरावठा योजना यासह अन्य विकास कामे सुरु असून रस्ते खोदले जात असल्याने, जलवाहिन्या फुटल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तर महापालिकेकडे कर्मचारी वर्ग कमी असल्याने, फुटलेल्या जलवाहिन्या अनेक दिवस दुरस्ती केली जात नाही. फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी खाली जात असून अशी परीस्थिती संपूर्ण शहरांत निर्माण झाली आहे.

 दुरस्तीचे काम जलदगतीने

महापालिका पाणी पुरवठा विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असलातरी विविध माध्यमातून फुटलेल्या जलवाहिन्या दुरस्तीचे काम केले जाते, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी सांगितले. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरUlhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022water shortageपाणीकपात