शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
3
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
4
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
5
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
6
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
7
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
8
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
9
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
10
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
11
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
12
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
13
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
14
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
15
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
16
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
17
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
18
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
19
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
20
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

पाणीसमस्या मिटली; भातसासह बारवी धरणात ९० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:45 AM

ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गावखेड्यांतही पाऊस पडला नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या ...

ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गावखेड्यांतही पाऊस पडला नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस उत्तमरीत्या बरसल्याने धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ९०.११ टक्के, तर बारवी धरणात ८९.९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे वर्षभराची पाणीसमस्या आता मिटली आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही धरणांत काही अंशी पाणीसाठा कमी आहे.

बारवी धरणात अवघा १८६९ मि.मी. पाऊस पडला आहे. यापेक्षा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये खानिवरे या पाणलोटात आतापर्यंत २६२३ मि.मी. पाऊस पडला आहे. कान्होळला २००१ मि.मी., पाटगावला १९२२ मि.मी. आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २२२७ मि.मी. सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा ८९.९६ टक्के झाला आहे. या बारवी धरणाची आजची पाणीपातळी १७.५४ मीटर नोंदली आहे. या धरणात मंगळवारी ३३८.८४० पैकी ३०४.८१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला आहे. या धरणाप्रमाणे भातसा धरणातही यंदा ९०.१३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी भातसामध्ये ९५.३७ टक्के साठा होता. या भातसा व बारवी धरणांच्या तुलनेत आंध्रा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत आता जास्त पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ६२.६६ टक्के असलेला पाणीसाठा यंदा ६८.५६ टक्के झाला आहे.