शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

Ulhasnagar: उल्हासनगरात पाणी टंचाई, नागरिक त्रस्त, जलवाहिनी आणि जलकुंभाला गळती

By सदानंद नाईक | Published: June 13, 2023 7:58 PM

Water shortage in Ulhasnagar:

- सदानंद नाईकउल्हासनगर - शहरातून बारामाही वाहणारी उल्हास नदी असूनही महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना नाही. पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत असून शहरातील बहुतांश ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न उभा ठाकला आहे.

उल्हासनगरच्या हद्दीतून वाहणाऱ्या उल्हास नदीवर संच्युरी कंपनीची स्वतःची पाणी पुरवठा योजना आहे. तसेच नदी पात्रातून एमआयडीसी पाणी उचलून शहराला पाणी पुरवठा करीत आहेत. शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी उल्हास नदीवरील पाणी पुरवठा योजना उल्हासनगर महापालिकेला हस्तांतरण करण्याची मागणी जुनी आहे. दरम्यान या प्रक्रियेला गती आली होती. मात्र नंतर ही योजना रेंगाळली आहे. तर शहर पूर्वेला एमआयडीसीच्या पालेगाव जलकुंभातून व जलवाहिनीतून पाणी पुरवठा होतो. दरम्यान महापालिकेने ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजने अंतर्गत ११ नवीन जलकुंभ, एक भूमिगत जलकुंभ, पंपिंग स्टेशन उभारले आहे. त्याच बरोबर ५५ हजार पाणी मीटर बसविण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र ५५ हजार पाणी मीटर गेले कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

शहरातील सुभाष टेकडी परिसरातील नागसेननगर, आम्रपालीनगर, साईनगर, महात्मा फुले कॉलनी, कुर्ला कॅम्प परिसर, संतोषनगर, महादेवनगर, गायकवाड पाडा, गणेशनगर, ज्योती कॉलनी, राहुलनगर, शांतीनगर, इमली पाडा आदी ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून महिलांनी दोन दिवसांपूर्वी थेट पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक दिली होती. पाणी पुरवठा विभागाचे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकारी अभियंता पद रिक्त असून विभागात बहुतांश पदे प्रभारी आहेत. त्यामुळे विभागात सावळागोंधळ उडाल्याचे चित्र आहे. नव्याने हातपंप खोदणे व हातपंप दुरुस्तीवर दरवर्षी लाखोचा खर्च करूनही ३० टक्के पाणी गळती कायम आहे. तसे महापालिका अधिकारीच जाहीरपणे सांगत आहेत. एकूणच पाणी पुरवठा विभागाला सक्षम अधिकारी व कार्यकारी अभियंता पदाची गरज आहे. विभागात २५० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करीत आहेत. मात्र कोणत्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत काम करतात. हा संशोधनाचा विषय झाला आहे.

राजकीय नेत्यांनी बघायची भूमिका महापालिका निवडणुका येताच भावी नगरसेवकात वाढ होऊन नागरिकांचे कामे करतात. मात्र महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्याने, माजी नगरसेवकासह भावी नगरसेवकही आज पाहायला मिळत नसल्याने, नागरिकांचे पाणी टंचाई प्रश्न तसाच टांगलेला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातulhasnagarउल्हासनगरthaneठाणे