शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

शहापूर तालुक्यातील दोन पाड्यांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 23:11 IST

ग्रामस्थांची वणवण : टँकरची केली मागणी

भातसानगर : शहापूर तालुक्यात हिवाळा संपतो न संपतो तोच दोन पाड्यात पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरूवात झाली आहे. तालुक्यात मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने व पाऊसही लवकरच गेल्याने गावपाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. यावर्षी अधिक पाऊस पडल्यामुळे उशिरा पाणीटंचाई निर्माण होईल असे वाटत असतानाच अजनूप, दापूर परिसरातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टंचाई निर्माण झाली आहे.

कोळी पाडा व वारली पाडा येथील ग्रामस्थ एकाच विहिरीवर पाणी भरतात. मात्र आता याच विहिरीत पाणी नसल्याने त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोळीपाड्याची लोकसंख्या आज अडीचशेच्या आसपास असून वारली पाड्याची लोकांख्या ही शंभर इतकी असून या दोन्ही पाड्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

या पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी सोमवारीच ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे. अजूनही हिवाळा संपला नसूनही या पाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना आता पाण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे. दरवर्षी या पाड्यात टंचाई निर्माण होत असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.माझ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील कोळीपाडा, वरचा गायदरा या दोन पाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे. - प्रदीप चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य 

टॅग्स :water shortageपाणीकपातshahapurशहापूर