शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि व्यवसायासाठी गुजरात लागतो - उद्धव ठाकरे

By पंकज पाटील | Updated: January 13, 2024 17:02 IST

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा अंबरनाथ पासून सुरू केला.

अंबरनाथ: निवडणुका लागल्यानंतर आता भाजपाचे सगळेच नेते गोड बोलू लागले आहेत. पंतप्रधान देखील आता प्रचंड गोड बोलत असून त्यांना निवडणुकीसाठी महाराष्ट्र लागतो आणि व्यवसायासाठी गुजरात लागतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर केली.       

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा अंबरनाथ पासून सुरू केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली. किमान पंतप्रधानांनी घराणेशाहीवर काहीही बोलू नये. ते आमच्या घरावर बोलत असतील तर आम्ही देखील त्यांच्या घरावर बोलू असे म्हणत पंतप्रधानांना टार्गेट केले. गद्दारांची घराणेशाही संपवल्याशिवाय खरा शिवसैनिक गप्प बसणार नाही. जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत असे म्हणत यावेळी उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना एकसंघ राहण्याच आवाहन केले. राम मंदिर आणि राम मंदिराची पूजा ही राष्ट्रीय अस्मितेचा विषय असून त्यासाठी राष्ट्रपतींना हातून पूजा करणे गरजेचे होते. मात्र राम मंदिराच्या आड निवडणुकीचा प्रचार काही लोक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला असून तो बालेकिल्ला शाबूत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. या मतदारसंघात असलेली गद्दारांची घराणेशाही संपवली गेलीच पाहिजे असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. महापालिका आणि नगरपालिका च्या निवडणुका घेण्यासाठी देखील सरकार घाबरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार राजन विचारे, राजेश वानखेडे, अजित काळे, संदीप पगारे, जाणू मानकर, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, सदाशिव पाटील, कबीर गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेambernathअंबरनाथ