शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

भारनियमनाचा भडका ; शाळा, रूग्णालये, उद्योग, नेटवर्कला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 2:03 AM

कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात उद््भवलेल्या भीषण वीजटंचाईचा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून सर्वत्र तीन ते आठ तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.

ठाणे : कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात उद््भवलेल्या भीषण वीजटंचाईचा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून सर्वत्र तीन ते आठ तासांचे भारनियमन सुरू झाले आहे. त्याची अंमलबजावणी गुरूवारी सुरू झाली. त्याचा फटका सहामाही परीक्षांना बसला असून विद्यार्थ्यांना व-हांड्यात बसवण्याची वेळ आली आहे. रूग्णालये, बँका, एटीएम यांनाही त्याचे चटके बसू लागले आहेत. वीजपुरवठा बंद असल्याने अनेक भागातील नेटवर्क डाऊन झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच आठवड्यात ‘हर घर मे बिजली’ची घोषणा केली होती. ती विरते न विरते तोच वीज उत्पादन घटल्याने नागरिकांना भारनियमनाचे चटके बसू लागले आहेत. आॅक्टोबर हिटचा तडाखा बसल्याने विजेची मागणी वाढली आहे. पण भारनियमनामुळे नागरिक त्रासून गेले आहेत. जोवर उत्पादन पूर्ववत होत नाही, तोवर भारनियमन सुरू राहील, असे महावितरणच्या अधिका-यांनी सांगितले.लघुउद्योगांना फटका : या भारनियमनाच्या झळा लघू उद्योगांना बसल्या आहेत. दिवाळीचा फराळ तयार करणारे बचत गही हवालदिल झाले आहेत. शिवाय दुकानांनाही त्याचा फटका बसला आहे. रुग्णांसह नातेवाइकांचे हालठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालयात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. तेथील जनरेटरचा उपयोग महत्त्वाच्या विभागासाठी होत असून इतर विभागात वीज नसल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरू झाले आहेत. रुग्णालयातील विविध विभागात भरदुपारी अंधार पसरल्याचे पाहायला मिळते आहे. डोंबिवलीकरांत रोष : डोंबिवली शहरात सकाळी, दुपारी आणि सायंकाळी कमीत कमी दीड तास ते चार तास असे दोन टप्प्यातील भारनियमन सुरू झाले. त्यामुळे नागरिकांत रोष आहे. परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने त्याचा त्रास विद्यार्थ्यांनाही होतो आहे. सकाळच्या वेळेतील भारनियमनाची वेळ बदलण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी महावितरणच्या अधिकाºयांकडे केली. शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनीही निवेदन देऊन भारनियमनाचा निषेध केला. डोंबिवलीत १०० टक्केवीजबिलाची वसुली होत असून, चोरीचे प्रमाणही अत्यल्प असल्याने भारनियमन रद्द करावे. ते शक्य नसेल तर सकाळची वेळ बदलावी, अशी मागणी त्यांनी केली.अंबरनाथ, बदलापूरला चटकेअंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथमध्ये चार ते पाच तासांचे भारनियमन लागू झाले आहे. त्याचा फटका नागरी पट्ट्यासह उद्योगांना, शेतीला बसला आहे. बदलापूरमध्ये दोन टप्प्यांत साडेतीन ते चार तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.भिवंडीत यंत्रमागाला फटकाभिवंडी : भिवंडीत आठ तासांचे भारनियमन जाहीर झाले. ते दोन टप्प्यात लागू होईल, असे ठरले होते. मात्र सलग सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहतो आहे. त्याचा फटका यंत्रमाग उद्योगाला, रूग्णालयांना बसला आहे.भार्इंदरचा काजूपाडा घामाघूममीरा रोड : मीरा रोड-भार्इंदरला रिलायन्स, टाटाचा वीजपुरवठा होत असल्याने शहरात भारनियमन नाही. पण घोडबंदर रोडवरील काजूपाडा, चेणा गावात दोन टप्प्यात सहा तासांचे भारनियमन सुरू आहे. तेथे एरव्हीही एक ते तीन तास वीजपुरवठा बंद असतो.सहा तासउल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये सहा तास भारनियमन सुरू झाल्याने व्यापाºयांसह नागरिकांनी संताप केला. बिलाची वसुली जादा-चोरी कमी तेथे साडेतीन तास, तर जेथे चोरी जास्त व वसुली कमी आहे तेथे सहा तास भारनियमन आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा