शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

टंचाईच्या काळात विहिरींचा आधार

By admin | Published: March 14, 2016 1:47 AM

पाणीकपातीमुळे शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचा परिणाम शहरभर दिसत आहे. तर, आठवड्यातील तीन दिवस असलेल्या ठणठणाटाला दुर्लक्षित विहिरींचा आधार नागरिकांनी घेतला आहे.

भार्इंदर : पाणीकपातीमुळे शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचा परिणाम शहरभर दिसत आहे. तर, आठवड्यातील तीन दिवस असलेल्या ठणठणाटाला दुर्लक्षित विहिरींचा आधार नागरिकांनी घेतला आहे. आॅक्टोबर २०१५ पासून ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. यंदा त्यात वाढ झाली आहे. शहरासाठी पाण्याचा नवा स्रोत नसल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. या कपातीमुळे आठवड्यातून केवळ चार दिवसच पाणीपुरवठा होत आहे. दोन वर्षांपूर्वी पालिका हद्दीतील जलसाठ्याचा वापर करण्याचा विचार प्रशासनस्तरावर सुरू झाल्यानंतर त्याला काही अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने त्याची नितांत आवश्यकता यंदा जाणवू लागली आहे. शहरात सुमारे डझनभर सार्वजनिक विहिरी, ११ तलाव असा सहज उपलब्ध होणार जलसाठा आहे. शिवाय, मर्गाळी तलाव व चेना नदीचे अस्तित्व आहे. यातील मर्गाळी तलाव सध्या एमएमआरडीएच्या विशेष पर्यटन क्षेत्राच्या हद्दीत गेल्याने पालिका हद्दीत असलेल्या चेना नदीतील पाणी टँकरद्वारे उपसा करून ते पिण्याखेरीज इतर वापराकरिता देण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुरेश काकाणी यांनी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, हे पाणी उपसणे अव्यवहार्य असल्याचा फतवा काढून त्याला प्रतिसादच मिळाला नसल्याचे कारण अधिकऱ्यांनीच पुढे केल्याने ती प्रक्रिया बासनात गुंडाळली आहे. शहरात असलेल्या सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून त्या नागरिकांच्या वापरासाठी खुल्या करण्याचे आदेश देऊनही त्याकडे आजतागायत दुर्लक्ष केले आहे. परंतु, याच विहिरी ऐन कपातीच्या काळात नागरिकांना आशेचा किरण ठरत आहेत. स्टेम व एमआयडीसीने गुरुवार ते शनिवारदरम्यान शहराला पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे शहरातील सर्वच नळ कोरडे पडल्याने नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे नागरिकांनी थेट सार्वजनिक व खाजगी विहिरींकडे मोर्चा वळवून गरज भागवली. जोपर्यंत कपात लागू आहे, तोपर्यंत शहरातील सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून त्यातील पाणीकपातीच्या काळात द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.