शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

ठाण्याच्या मेट्रोचा नारळ केव्हा फुटणार!

By admin | Published: June 08, 2015 3:54 AM

मुंबईतील मेट्रो रुळांवर आल्यानंतरही ठाण्यातील मेट्रो रेल्वे अडथळ्यांच्या शर्यतीत अडकली होती. मात्र, त्यातूनही मार्ग काढून वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोला अखेर गेल्या वर्षी मंजुरी मिळाली.

अजित मांडके/ पंकज रोडेकर, ठाणे मुंबईतील मेट्रो रुळांवर आल्यानंतरही ठाण्यातील मेट्रो रेल्वे अडथळ्यांच्या शर्यतीत अडकली होती. मात्र, त्यातूनही मार्ग काढून वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोला अखेर गेल्या वर्षी मंजुरी मिळाली. मात्र, ठाणे मेट्रोच्या भूमिपूजनाला अद्यापही मुहूर्त लागत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे इतर शहरांमध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला वेग येत असताना ठाण्यावरच अन्याय का, असा सवालही उपस्थित होत आहे.कासारवडवली येथे मेट्रोच्या कारशेडसाठी सुरू केलेल्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. याच दरम्यान, या प्रकल्पामुळे जमिनींच्या किमतींमध्ये वाढच होणार असल्याने शेतकऱ्यांना दुप्पट फायदा तसेच भूमिपुत्रांना रोजगारही मिळणार आहे. या कारशेडसाठीही शेतकऱ्यांची समजूत काढण्यात पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना यश आले आहे. त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात येणार असल्याने या शेतकऱ्यांनी कारशेडसाठी आपल्या जमिनी देण्यास हिरवा कंदील दर्शविल्यावर मेट्रोच्या कारशेडच्या ४० हेक्टर जागेचा सर्व्हे पूर्ण झाला. त्यानंतर, आता तांत्रिक डिझाइन तयार करण्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू झाले होते. डिझाइनचे काम पूर्ण झाल्यावर पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.वडाळा ते घोडबंदर-कासारवडवली या महत्त्वाकांक्षी मेट्रोच्या या मार्गासाठी १९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून ३२ किमीच्या या मार्गामध्ये ३० स्थानके असणार आहेत. त्यातील २४ स्थानके भुयारी असणार आहेत. सहा स्थानके ही वरील बाजूस असणार आहेत, तर ठाण्यात एकूण १३ स्थानके असणार आहेत. ही सर्व स्थानके भुयारीच असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.च्तीनहात नाका ते ओवळा कारशेडपर्यंत १३ स्थानके प्रस्तावित आहेत. यामध्ये तीनहात नाका, आरटीओ, वागळे, कॅडबरी, गोल्डन डाइज, कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा, टिकुजिनीवाडी, आनंदनगर, वाघबीळ, कासारवडवली आणि ओवळा (कारशेड) अशी स्थानके आहेत. कारशेडच्या मुद्द्यावर श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली होती. त्या वेळी आरोप-प्रत्यारोपांचे राजकीय युद्ध रंगल्याने मेट्रोचे कारशेडच आता कारशेडला लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती.च्ठाण्याच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या प्रकल्पाबाबत आपण त्वरित निर्णय घेऊन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्याचे निर्देश द्यावेत व आपल्या हस्ते होणाऱ्या या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तारीखही निश्चित करावी, अशी मागणी ठाणेकरांकडून होत आहे. कारशेडसाठी ओवळा-भाईंदरपाडा येथील शॅलो वॉटर पार्ककरिता आरक्षित असलेल्या ६०० एकर जागेवर बाधितांना स्थलांतरित केले जाईल. कासारवडवलीतील २० ते २५ शेतकरी बाधित होणार आहेत.