शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

कार्यकर्त्यांना कंडोमसारखे का वापरता?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 7:10 AM

शिवसेना-भाजप युती तीन दशके होती. या युतीला दोनवेळा सत्ता प्राप्त झाली. परंतु तरीही युतीत आपण सडलो, अशी दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांची भावना झाली.

- संदीप प्रधान

राज्यातील बाळासाहेबांची शिवसेना व भाजप यांचे सरकार नागपूरमध्ये विरोधकांच्या आरोपांचा सामना करीत होते. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडू लागल्या, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छातीचा कोट करून उभे राहिले आणि त्यांनी विरोधकांचे वार आपल्या छातीवर झेलले. रोखठोक उत्तरे दिली. विरोधकांचे टीकास्त्र निष्प्रभ करण्याचा प्राणपणाने प्रयत्न केला. त्याचवेळी ठाण्यातील कशिश पार्क या मराठमोळ्या, उच्च मध्यमवर्गीयांच्या वस्तीत भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांना पक्षाचा फलक लावण्याच्या वादातून मारहाण झाली. त्यांचे डोके फुटले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना इस्पितळात दाखल केले. 

जाधव यांनी आपल्या तक्रारीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले आदी १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जाधव यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. नागपूरमधील चित्राच्या विसंगत चित्र ठाण्यात दिसत होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून ‘उठाव’ करून शिंदे व त्यांच्या साथीदारांनी वेगळा पक्ष स्थापन केला. सरकारवर मांड ठोकली. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचा संघर्ष चुकीचा असला तरी नैसर्गिक मानता येईल. परंतु भाजप व बाळासाहेबांची शिवसेना हे आता मित्रपक्ष आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडणुकीत पराभूत करण्याकरिता उभय पक्षांना येणाऱ्या महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत परस्परपूरक राजकारण करायचे आहे. 

शिवसेना-भाजप युती तीन दशके होती. या युतीला दोनवेळा सत्ता प्राप्त झाली. परंतु तरीही युतीत आपण सडलो, अशी दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांची भावना झाली. त्यातून ही युती फुटली.  महाराष्ट्राची जनता सरसकट एकाच पक्षाला कौल देत नाही. त्यामुळे युती, आघाडी ही अपरिहार्यता आहे. काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली. दोन्ही काँग्रेसने पंधरा वर्षे सत्ता उपभोगली. मागील पाच वर्षांत शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता राबवली. परंतु गावागावात दोन्ही काँग्रेसमधील संघर्षाचे आविष्कार पाहायला मिळतात. 

ठाण्यात शिंदे यांचा वरचष्मा आहे. त्यांच्या नेत्यांचे काही गड आहेत. ठाकरेंच्या खांद्यावर उभी राहिलेली भाजप डोक्यावर बसू लागली, तेव्हा ठाकरेंनी तिला झिडकारले. कशिश पार्क हा शिंदेंचा गड असेल तर तेथेच घुसखोरी करण्याची घाई भाजपला व्हावी, हे आततायीपणाचे आहे. त्याचबरोबर मित्र पक्षाचा फलक देखील लावू देणार नाही, ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची भूमिका सुईच्या अग्रावर राहील एवढीही हस्तिनापूरची जमीन देणार नाही, असे म्हणणाऱ्या दुर्योधनापेक्षा वेगळी नाही. प्रशांत जाधव आणि या हल्ल्याकरिता पोलिसांनी अटक केलेले अमरिक राजभर यांना त्यांच्यावरील खटले आयुष्यभर लढत रहावे लागणार.

महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यावर शिंदे-फडणवीस एकमेकांना पेढे भरविणार. इतकेच कशाला निरंजन डावखरे व विकास रेपाळे हेही हातात हात घालून महापालिकेची सत्ता राबवतील. जाधव-राजभर हे एकमेकांवर गुरगुरत राहतील. त्यांचे कुटुंबीय सतत दडपणाखाली राहतील. डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते मनोज कटके व कृष्णा परुळेकर यांच्यावर यापूर्वी हल्ले झाले; पण आरोपी मिळाले नाहीत. सत्ता, पैसा हा नेत्यांकरिता इतका जीव की प्राण असतो की, जाधव, कटके, परुळेकर अशा शेकडोंचे जीव त्यांना त्यापुढे कस्पटासमान वाटतात. मूर्ख कार्यकर्त्यांनी शहाणे होणे गरजचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र