शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

विनामास्क फिरणाऱ्यांची करणार अँटिजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:40 AM

कल्याण : कोरोना रुग्ण वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली मनपाने कडक निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्यांची अँटिजेन चाचणी केली ...

कल्याण : कोरोना रुग्ण वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली मनपाने कडक निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्यांची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. त्यात ते पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांची रुग्णालयात रवानगी केली जाईल. तसेच मंगल कार्यालये आणि भाजी मंडई यांच्यावर करडी नजर असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणारी मंगल कार्यालये ३० एप्रिलपर्यंत सील केली जाणार आहेत.

राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी सोमवार रात्री ८ पासून सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बैठक घेतली. त्यात अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, उपायुक्त विवेक पानसरे, साहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, मनपा अधिकारी उपस्थित होते.

सूर्यवंशी म्हणाले की, लग्नकार्यास ५० जणांना उपस्थित राहता येईल. मात्र, अनेक मंगल कार्यालयांत नियमांचे उल्लंघन होत आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाईही केली जात आहे. यापुढे मंगल कार्यालयांत नियमांचे उल्लंघन झाल्यास ही कार्यालये ३० एप्रिलपर्यंत सील केली जातील. मनपा हद्दीतील मंगल कार्यालयांची यादी पोलिसांना दिली आहे. लग्न कार्यालये आयोजित करणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. मनपा हद्दीत अत्यावश्यक सेवा-सुविधांना सवलत दिली आहे. मात्र, भाजी मंडईत नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे भाजी मंडईवर नव्या निर्बंधांनुसार नजर ठेवली जाणार आहे.

मनपाकडून विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. आता त्यांच्याकडून दंड घेण्याबरोबर त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांची रवानगी रुग्णालयात केली जाईल, अशी माहिती पोवार यांनी दिली. त्यासाठी डाेंबिवलीत रामनगर पोलीस ठाणे आणि कल्याणमध्ये जुने महात्मा फुले पाेलीस ठाण्यात चाचणीची सुविधा केली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक वस्तूच्या दुकानदारांनी वर्तुळ आखून ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवून सेवा द्यावी. अन्यथा त्यांच्या विरोधातही कडक कारवाईचा इशारा मनपाने दिला आहे.

- मागच्या वर्षी कोरोनाकाळात डोंबिवलीत एका लग्नामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले होते. आताही हळदी आणि लग्न सभारंभ सुरूच आहेत.

- अत्यावश्यक सेवेत भाजीपाला विक्रेत्यांना मुभा दिली असली तरी त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत आहे.

- कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती रविवारी बंद ठेवण्यात येते. तसेच अन्य दिवशी ५० टक्के क्षमतेने चालविली जाते.

--------------