शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांनी टाटांना वाहिली श्रद्धांजली; अखेरच्या निरोपासाठी भलीमोठी रांग
2
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"; राज ठाकरेंचे मोदींना पत्र
3
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
4
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
5
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
6
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
7
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
8
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
9
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
10
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
11
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
12
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
13
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
14
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल
15
"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले
16
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
17
Ratan Tata News : 'ही' ठरली रतन टाटांची अखेरची डील, मिळवला होता २३,००० टक्क्यांचा नफा; कोणता होता व्यवहार?
18
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
19
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
20
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण

कचरा शुल्क मागे घ्या अन्यथा भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:45 AM

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात घरे व आस्थापनांमधून कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात येणारे उपयोगकर्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात घरे व आस्थापनांमधून कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात येणारे उपयोगकर्ता शुल्क तत्काळ दर रद्द करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली. तसेच कोरोना महामारीच्या काळात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जी मनमानी केली आहे, त्याचा त्यांना जाब विचारावा, अशी मागणीही त्यांनी केली. आयुक्तांनी शुल्क आकारणीचा फेरविचार केला नाही तर भाजप आंदोलन करील, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

घनकचरा कर वाढवून सामान्य नागरिकांना प्रतिमहिना ५० रुपये आकारणी करण्याचा जो घाट महापालिकेने घातला आहे तो योग्य नाही, असे सोमवारी पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले. हा कर लावण्यापूर्वी महापालिकेने काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून १ जुलै २०१९ रोजी काढलेल्या अधिसूचनेचा दाखला दिला. तसेच महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम ४६४ अन्वये उपविधी निरसित करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चव्हाण म्हणाले की, नवी मुंबई, वसई विरार, नाशिक व पिंपरी चिंचवड महापालिका या सर्व महापालिकांची आर्थिक स्थिती व स्वच्छ भारत अभियानातील सहभाग व परिणाम पाहता हा अधिभार तेथे लावणे उचित ठरले असते. स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई महापालिकेचा देशात दुसरा क्रमांक असून, वसई विरार, नाशिक व पिंपरी चिंचवड महापालिका यांनी स्वच्छतेसंदर्भात केलेले काम हे कल्याण - डोंबिवली महापालिकेपेक्षा चांगल्या दर्जाचे आहे. कल्याण - डोंबिवली महापालिकेकडून कचरा गोळा करणे तसेच कचरा विलगीकरणासंदर्भात मागील दोन वर्षांमध्ये कुठलीही सुविधा मिळत नसताना नागरिकांवर अधिभार लादणे अन्यायकारक आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेसंदर्भात चांगल्या सुविधा दिल्यानंतर हा अधिभार लावणे उचित ठरेल. या महापालिका क्षेत्रात मध्यमवर्गीय लोकवस्ती असून, त्यांना मागील एक वर्षापासून कोरोनामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त काम करत आहेत. सध्या येथे नगरसेवक नाहीत. आयुक्त हेच प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांनी नागरिकांच्या हिताचा विचार करून निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा भाजप नागरिकांसाठी रस्त्यावर उतरेल, त्याची जबाबदारी आयुक्तांची असेल, असा इशारा चव्हाण यांनी दिला.

............

वाचली