शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

महाविकास आघाडीसोबत जाऊन महाकलंक लावण्याचे काम; शिंदे यांनी साधला उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

By अजित मांडके | Published: July 13, 2023 10:22 PM

काही बेरजेची गणित असतात. भाजपसोबत झालेली युती भावनिक आहे. एक विचार आहे.

ठाणे : देवेंद्र यांना कलंक लावल्याचे बोलत आहात मात्र २०१९ ला महायुतीला स्पष्ट बहुमत असताना तुम्ही महाविकास आघाडी बरोबर जाऊन महाकलंक लावण्याचे काम केले असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. अजित पवार विकासाला साथ देण्यासाठी एकत्र आले. काही बेरजेची गणित असतात. भाजपसोबत झालेली युती भावनिक आहे. एक विचार आहे. त्यामुळे काही चिंता करू नका २०० पेक्षा जास्त आमदारांचा पाठबळ आपल्याला आहे, असे सांगून शिवसेनेतील आमदारांची अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न केला.

      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला ठाण्यातून सुरुवात झाली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी ही टीका केली आहे.आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. तुम्हाला पण पट्टा लावायची वेळ येईल असं काही जण बोलत आहेत, पण एकनाथ शिंदेला पट्टा ची काय भीती सर पे कफन बांध दिया तो क्या डरना आपल्याला पट्ट्याची काय गरज असे सांगत त्यांनी उद्धव यांची खिल्ली उडवली. संघटना मोठी करायची असेल तर कार्यकर्त्याला बळ द्याचे असते, त्याला मोठे करायचे असते हे मी अनेक वेळा बोलून झालो कोणाला ते तुम्हाला माहित आहे असे सांगत टीका केली. आगामी निवडणूक मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढायची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अडीच वर्षा पूर्वी सत्तेत असताना सावरकरांच्या बाबत निर्णय घेता आला आणि किंवा आनंद साजरा करता आला नाही, ३७० कलम यावे ही बाळासाहेबांची इच्छा होती, मात्र त्याचा देखील आनंद साजरा करता आला नाही, ४५ पेक्ष्या जास्त लोकसभा आणि २१० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार असल्याचे त्यानी सांगितले, काही बेरेजचे गणित करावी लागतात त्यामुळे आगामी निवडणूक महायुतीमध्ये लढविल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, आणि यापुढं तुम्हाला जिल्ह्यात एकनाथ शिंदे म्हणून काम करायचे असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब आणि दिघे यांच्या काळात आपण अनेक चढ उतार पाहिले पण त्यावेळी दिघे आपल्या सोबत होते. आता सुद्धा आपण अनेक चढ उतार पाहिले आहेत पण आपण लढणारे सेनीक असंल्याचे त्यांनी सांगितले. आज फडणवीस यांच्यामुळे राज्याचे नेतृव करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले. मात्र अडीच वर्षे काहींनी केवळ १०० टक्के राजकारण केले पण त्यांनी काय मिळवले असा सवाल ही त्यांनी केला. स्वतःसाठी  नाही घेतला जनतेसाठी निर्णय घेणे महत्वाचे असल्याचे ही ते म्हणाले. सत्तेसाठी बाळासाहेब यांचे विचार पायदळी तुडवले असल्याचा आरोपही त्यांनी केला. पण सत्तेची हवा डोक्यात गेली की काय होते हे आता समजले असेल असा टोलाही त्यांनी लगावला.  मुंबईत सत्ता असताना लोकांना खड्यातून प्रवास करायला लावला मात्र आता आम्ही काँक्रीट रस्ते सुरू केले असल्याचे ते म्हणाले.

आता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे वाटचाल करायचे आहे.  त्यामुळे आगामी निडणुका या महायुती मधून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचा प्रवेश -या मेळावयाच्या निमित्ताने मुंबईच्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुप्रिया मोरे व त्यांचे पती सुनील मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे