शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

जागतिक यकृत दिन - १९ एप्रिल -  भारत जगातील सर्वाधिक यकृत रोग मृत्यू नोंदवणारा देश 

By धीरज परब | Updated: April 19, 2025 15:22 IST

भारतात दरवर्षी सुमारे २ लाख ६८ हजार ५८० लोकांचा मृत्यू यकृत रोगामुळे! 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- भारतात यकृत संबंधित आजार व त्याने होणारे मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात दरवर्षी सुमारे २ लाख ६८ हजार ५८० लोकांचा मृत्यू यकृत रोगामुळे होतो. जगभरात यकृत रोगां मुळे मृत्यू होण्याच्या तुलनेत  १८.३% मृत्यू एकट्या भारतात होतात. त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक यकृत रोग मृत्यू नोंदवणारा देश ठरतो. देशातील एकूण मृत्यूं पैकी ३.१७% इतके प्रमाण यकृत रोगांच्या कारणांनी आहे. 

यकृताचे महत्त्व, यकृत रोग टाळण्यासाठी उपाय आणि जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १९ एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात यकृतसंबंधित मृत्यू वाढत असताना, आहाराच्या माध्यमातून प्रतिबंधक उपाय योजणे ही काळाची गरज झाली आहे.

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. आदित्य वर्मा म्हणाले कि, “भारत  गंभीर यकृत रोगाच्या महामारीला सामोरे जात आहे, आणि त्यामागे आहार हेच मुख्य  प्रमुख कारण आहे. रोजचे जेवण आपले यकृत बिघडवू शकते किंवा ते सुधारू शकते. आज धकाधकीच्या जीवनात शहरातील नागरिक झटपट खंमग पदार्थ खाण्याच्या आहारी गेला आहे.  तिखट व तेलकट पदार्थांचा समावेश वाढल्याने पोटाचे आरोग्य बिघडून त्याचा दुष्परिणाम यकृतावर होत असतो. 

मुख्य म्हणजे यकृत बिघडल्याची लाक्षाने शेवटच्या टप्य्यात समजून येतात व त्यावेळी यकृत हे पूर्णपणे खराब झालेले असते. भारतात यकृत रोग होण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे फॅटी लिव्हर (चरबीयुक्त यकृत), हेपेटायटीस संसर्ग, मद्यपानामुळे होणारे यकृताचे नुकसान आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे मेटाबोलिक विकार. त्यात भर म्हणून, प्रक्रियायुक्त अन्न, साखर व अपारंपरिक चरबी यांचा अतिरेक यकृतासाठी अत्यंत हानिकारक ठरतो.

 आहार हेच आपले पहिले आणि प्रभावी औषध आहे. संतुलित आणि पोषणयुक्त आहाराच्या माध्यमातून यकृत रोगांचा धोका कमी करता येतो. बर्‍याच प्रकरणांमध्ये सुरुवातीचे यकृताचे नुकसान भरूनही निघू शकते.  देशात यकृताचे वाढते रोग पाहता वैद्यकीय तज्ज्ञांनी लोकांना आहाराच्या माध्यमातून आरोग्यावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

पांढर्‍या पीठाचे पदार्थ, साखर आणि तळलेले पदार्थ कमी करणे. संपूर्ण धान्ये, भाज्या, फळे आणि कडधान्य यांचा समावेश करणे. सत्त्वयुक्त सेंद्रिय चरबींचा उदा. सुका मेवा, बिया, ऑलिव्ह तेल चा वापर करणे. भरपूर पाणी पिणे आणि मद्यपानाचे प्रमाण कमी करणे असा आहारविषयक सल्ला डॉ. आदित्य वर्मा यांनी दिला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य