शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

दिव्यांग व्यक्ती नाउमेद होत नसतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश होऊ नये: यजुवेंद्र महाजन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 9, 2023 15:39 IST

यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील, विविध कलेत निपुण अशा आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला भेटीदरम्यान त्यांनी केलेले वक्तव्य.

ठाणे: दिव्यांग व्यक्ती जर नाउमेद न होता यशस्वी जीवन जगत असतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश व्हायचे काही कारणच नाही, असे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक व मनोबल प्रकल्पाचे प्रमुख यजुवेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील, विविध कलेत निपुण अशा आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला भेट दिली. मनोबल प्रकल्पात दिव्यांग मुलांना स्पर्धा परिक्षेसाठी तयार केले जाते, व्यक्तिगत विकास व त्यांच्यातील कला गुणांना वाव देऊन त्यांचा विकास केला जातो. तसेच उच्च शिक्षण दिले जाते. आपण कमजोर नाही आहोत, ही जाणीव करुन दिली जाते.

समस्या सर्वांना असतात, दिव्यांगांना फक्त शरीराची समस्या आहे. ती सुद्धा शरीराच्या एका भागाची समस्या आहे, दिव्यांगांकडे वैचारिक अपंगत्व नाही आणि जे धडधाकट आहेत त्यांच्याकडे विचारांचे अपंगत्व आहे. शरीराचे अपंगत्व चालेल पण विचारांचे अपंगत्व चालणार नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांकडून प्रगती कशी करायची हे शिकायला हवे, बुद्धी आणि हृदय असेल तर आपल्याला तर पुढे जाता येईल. आपला ॲटीट्युड कसा आहे, आपल्याकडे कोणते स्कील आहे, आपल्याकडे कोणते नाॅलेज आहे, आपली व्हील पाॅवर कशी आहे आणि किती मेहनत आपण करता, यावरच आपल्याला आयुष्यात पुढे जाता येईल, आपण उराशी बाळगलेले कोणतेही स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल.

समस्यांचे पाढे वाचू नका आणि दुखी राहू नका, कमतरता प्रत्येकात असते त्यावर मात करायला शिका, आपण जीवंत आहोत हीच मोठी गोष्ट आहे, याचा आनंद साजरा करायला शिका. सगळ्यांबरोबर मैत्री करा. स्वतःला कमी समजु नका आणि स्वतःला स्पेशलही समजु नका आणि जिथे मदतीची गरज आहे तिथे खुल्या मनाने मदत घ्यायला कचरु नका. नेहमी याचा विचार करु नका की मला कोणाकडून काय मिळेल, मी समाजाला काय देऊ शकतो याचाही विचार करा. नवीन तंत्रज्ञान, नवीन कम्युनिकेशन स्कील व नवीन कल्पना शिकणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी व्यायाम करणे, ध्यानधारणा करणे, चांगली पुस्तके वाचणे याची गरज आहे. याच गोष्टी आयुष्यात पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी मदत करतील. यामुळे दिव्यांग व्यक्ती जर नाउमेद न होता यशस्वी जीवन जगत असतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश व्हायचे काही कारणच नाही, असे विचार यजुवेंद्र महाजन यांनी मांडले.

 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबई