शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

यंदा निर्माल्यही झाले ५० टक्क्यांनी कमी, ठाणेकरांचे सामाजिक भान  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 2:05 AM

ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन हा उपक्रम ठाण्यात राबवला जातो. यंदाचे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवले जातात.

- स्नेहा पावसकरठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेकांनी गणेशोत्सव साजरा केला नाही किंवा अतिशय साध्या पद्धतीने केला. अर्थातच याचा परिणाम निर्माल्य संकलनावरही झाला. आतापर्यंत सात दिवसांचे गणपती विसर्जन झालेले असून ठाण्यात केवळ १३ ते १४ टन निर्माल्य गोळा झाले आहे. दरवर्षीच्या निर्माल्य संकलनाच्या तुलनेत ही संख्या अतिशय कमी असून यंदा ५० टक्के घट झाली आहे. त्याचबरोबर यंदा थर्माकोलचा वापर १०० टक्के न करता पर्यावरणप्रेमी अशी ओळख असलेल्या ठाणेकरांनी सामाजिक भान जपले आहे.ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन हा उपक्रम ठाण्यात राबवला जातो. यंदाचे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवले जातात. स्वयंसेवक ते निर्माल्य स्वीकारतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते. तसेच काहींनी गणपती घरीच विसर्जन केले असले तरी निर्माल्य मात्र जमा केले. कोरोनामुळे साधेपणाने साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचा परिणाम निर्माल्य संकलनावरही पाहायला मिळाला. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान सुमारे तीन टन, पाच दिवसांचे गणपती विसर्जनादरम्यान साधारण साडेचार टन तर सात दिवसाच्या विसर्जनादरम्यान सहा टन निर्माल्य जमा झाले आहे. एकूण १३ ते १४ टन निर्माल्य जमा झाले आहे.दरवर्षी सात दिवसात सुमारे ३० टन निर्माल्य जमा होते, मात्र यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाल्याने सजावट, आरास, हार-फुले यावरचा खर्च बहुतांश टाळला गेला आहे. परिणामी निर्माल्यात ५० टक्के घट झाली.विशेष म्हणजे यंदाच्या निर्माल्यात थर्माकोल अजिबात आढळले नाही. थर्माकोलचा वापर ठाणेकरांनी केलेला नाही, असेच दिसते. प्लास्टिकचा वापरही ८० टक्के केलेला नाही. तसेच इतर अविघटनशील पदार्थांचा वापरही करणे ठाणेकरांनी टाळलेले दिसले. सजावटीला यंदा प्राधान्यच न दिल्याने सजावटीचे साहित्यही निर्माल्यात कमी होते. हे निर्माल्य वर्गीकरण करून पुढे प्रक्रियेसाठी पाठवले आहे.- भटू सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी,समर्थ भारत व्यासपीठजनजागृतीचा होत आहे फायदा : यापूर्वी सजावटीसाठी थर्माकोलबरोबर प्लास्टिक, कार्डबोर्ड, हिरे, चमकीच्या टिकल्या यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. गेल्या काही वर्षांत झालेल्या जनजागृतीमुळे या सर्वांचा वापर कमी होत गेला. मात्र कोरोनामुळे यंदा कुठल्याही वस्तू आढळल्या नाहीत.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव