शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
3
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
4
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
5
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
6
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
7
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
8
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
9
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
10
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
11
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
12
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
13
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
14
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
15
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
16
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
17
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
18
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

सतत तुमची चिडचिड होत असेल, तर हे घ्या त्यावरचं उत्तर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 1:03 PM

.. तरी बरं!

ठळक मुद्देपरिस्थिती तर आपण बदलू शकत नाही, पण निदान आपला वैताग तरी कमी करू शकतो का? 

तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की काहीच तुमच्या मनासारखं होत नाही? म्हणजे तुम्ही खूप अभ्यास केला होता, पण नेमकं परीक्षेच्या वेळी बरं नव्हतं म्हणून चांगले मार्क्‍स मिळाले नाहीत.. किंवा तुम्ही खरंच गृहपाठ केला होता, पण तुम्ही खरंच वही घरी विसरलात आणि मग शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा केली.. किंवा तुम्ही लग्नाला जाण्यासाठी तुमच्या सगळ्यात आवडत्या नवीन ड्रेसला इस्त्री करायला घेतलीत आणि तेवढ्यात कोणीतरी हाक मारली आणि त्या गडबडीत नेमकं त्याचं वरचं नेट जळलं आणि आता तो घागरा तुम्ही घालू शकत नाही..जाऊदे. अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत सारख्या घडत असतात आणि त्यामुळे आपली त्या त्या वेळी भयंकर चिडचिड पण झालेली असते. आणि सारखं सारखं असं व्हायला लागलं की आपल्याला वाटतं, की अश्या सगळ्या गोष्टी फक्त माङयाच बाबतीत होतात. इतर सगळ्यांचं सगळं छान होतं. मलाच फक्त हवं तसं काही होत नाही. आणि मग आपणही प्रत्येक गोष्टीवरून चिडचिड करायला लागतो. पण आपल्याला जरी असं वाटत असलं तरी ते काही खरं नसतं. म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी फक्त आपल्याच बाबतीत घडतात हेही खरं नसतं आणि आपल्या बाबतीत सगळं वाईटच घडतं हेही खरं नसतं. पण ज्यावेळी काहीतरी असं मनाविरुद्ध घडतं तेव्हा ते हँडल कसं करायचं ते आपल्याला कळत नाही हा खरा प्रॉब्लेम असतो. आणि त्यावरचं उत्तर आहे, तरी बरं!प्रत्येक वेळी असं काही तरी झालं की त्याहून काय वाईट घडलं असतं त्याचा विचार करायचा आणि स्वत:ला सांगायचं की,  ‘तरी बरं, इतकं वाईट काही घडलं नाही!’म्हणजे सगळ्यात आवडता नवीन घागरा खराब झाला, तरी बरं, दुसरा एखादा ड्रेस घालायला होता. एकच ड्रेस असता तर मी लग्नात काय घातलं असतं? असा विचार करायचा, म्हणजे आपल्याला कमी त्रस होतो.परिस्थिती तर आपण बदलू शकत नाही, पण निदान आपला वैताग तरी कमी करू शकतो का?