शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
IND vs BAN: T20 मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर! २ IPL स्टार संघात, एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

कोरोना विषाणू जाणार नाही? मग आता सगळ्यांनी घरीच बसायचं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:19 PM

घरीच बसून राहाणं कसं शक्य आहे?

ठळक मुद्दे आपलं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवातही करु शकू. 

कोरोना कधीच जाणार नाहीये म्हणतात मग आपण कायम असंच घरात बसून राहायचं का? हे कसं शक्य आहे? - आर्या नवले, वर्धा

कोरोना विषाणू कधीच जाणार नाही हे अगदी खरं आहे. कोरोना विषाणूचे आजवर 1क्क् प्रकार माणसाला माहित झालेले आहेत. त्यातल्या आठएक  प्रकारांचा संसर्ग माणसाला होतो. पण कोविड 19 हा त्यातला सगळ्यात जास्त बाधा करणारा विषाणू आहे. यावर औषध नाही की लस नाही. लस शोधण्याचे प्रयन्त सुरु आहेत पण ती केव्हा मिळेल , हे आजतरी आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे कोरोना कधीच जाणार नाही हे एकाअर्थी बरोबर आहे. पण याचा अर्थ आपण कधीच घराबाहेर पडायचं नाही असा मुळीच नाही. आताची परिस्थिती बिकट आहे म्हणून आपला लॉक डाऊन सतत वाढवला जातोय. पण या विषाणूचा संसर्ग जरा आटोक्यात आला की आपल्याला बाहेर जायला आणि नियमित आपापलं काम करायला नक्की परवानगी मिळेल. तशी महाराष्ट्रात जे जे भाग ग्रीन झोन म्हणून घोषित झाले आहेत तिथे बंदी शिथिलही केलेली आहे. मुळात आर्या, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे कालपयर्ंत आपण जसं जगत होतो तसं यापुढे आपल्याला जगता येणार नाही. आपल्याला आपल्या सवयी आता बदलाव्या लागतील. आता लॉक डाउनच्या काळात आपण जे सोशल डिस्टंसिंग पळतोय ते आपल्याला कदाचित पुढे अजून काही महिने पाळावं लागेल. तोंडाला मास्क बांधूनच घराबाहेर पडण्याची सवय बदलून चालणार नाही. निदान पुढची एक दोन वर्ष तरी. आपण बाहेरून आणलेला भाजीपाला, बंद पाकिटातल्या वस्तू ज्याप्रमाणो घरात ठेवण्याआधी आता धुवून घेतोय तसंच आपल्याला कायम करावं लागेल. कचरा न करणं, रस्त्यात कुठेही न थुंकणं, शौचाला उघड्यावर न जाणं, सार्वजनिक स्वच्छता गृह वापरल्यावर भरपूर पाणी टाकून स्वच्छ ठेवणं या गोष्टींकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी सवयीचा भाग व्हायला हव्यात. बाहेर जाताना, बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणं हे कायमचं लक्षात ठेवावं लागेल. 

आणि सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला   सगळ्या सरकारी यंत्रणांनाही  त्यांची कामे चोखच करावी लागतील, आणि आपल्याला सगळ्यांना त्यांना मदतही करावी लागेल. म्हणजे मग आपण बाहेरही पडू शकू आणि आपलं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवातही करु शकू.