शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

आरोपी अद्याप मोकाट, मुख्यमंत्र्याचं त्यांना संरक्षण?; हल्ल्यानंतर आझादचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 18:15 IST

चंद्रशेखर हे त्यांच्या वाहनाने देवबंद दौऱ्यावर जात होते. तेव्हा अचानक अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली.

लखनौ - भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या देवबंद येथे पोहचताच भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आज आझाद यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले. पोलीस व सत्ताधाऱ्यांचं संरक्षण असल्यामुळेच आत्तापर्यत आरोपी पकडले गेले नाहीत, असेही आझाद यांनी म्हटले. 

चंद्रशेखर हे त्यांच्या वाहनाने देवबंद दौऱ्यावर जात होते. तेव्हा अचानक अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळी स्पर्श करून गेल्याने त्यांना दुखापत झाली असून गाडीवर देखील गोळ्यांचे निशाण दिसत आहेत. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी, माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला असता, त्यांनी हल्ल्याबाबत सांगताना थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. आरोपींना सत्तेचं, मुख्यमंत्र्यांचं संरक्षण असल्याचं ते म्हणाले.  

हा आजचा हल्ला नाही, वंचितांवर पूर्वीपासूनच असे हल्ले होत आहेत. हा कोणी पहिला वंचित नाही, ज्यावर हल्ला झाला. अशा अनेक घटना घडल्या असून अनेकांना जीव गेलाय. देशात कायद्याचं राज्य आहे, आज माझ्यासारख्या वंचितावर हल्ला झालाय. म्हणजे उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेची काय स्थिती आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. याप्रकरणी गेल्या २४ तासांत काय कारवाई झाली, असा सवाल चंद्रशेखर आझाद यांनी विचारला आहे. मी जीवन-मरणाची लढाई लढत होतो, पण आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. हे सत्तेच्या संरक्षणाशिवाय होऊच शकत नाही. पोलिसांची इंटेलिजन्स कुठे आहे, काय माहिती आहे त्यांच्याकडे, त्यांच्याकडे तर मोठी सुत्रं असतात. मग, आत्तापर्यंत आरोपी का पकडले नाहीत, असा सवाल चंद्रशेखर यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात विचारला आहे. तसेच, मी कोणी राणीचा मुलगा नाही, हा कुठल्या आयुक्तांशी संबंधित विषयही नाही. मी वंचितांचा मुलगा आहे, म्हणून काय फरक पडतो, असंच यांना वाटतंय. तसेच, आरोपींना मुख्यमंत्र्याचं संरक्षण आहे, कारण त्यांनी अद्याप या हल्ल्यासंदर्भात काहीही विधान केलं नाही, असे म्हणत चंद्रशेखर यांनी योगी सरकारला लक्ष्य केलं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBhim Armyभीम आर्मीChandrashekhar Azadचंद्रशेखर आझाद