शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांनी टाटांना वाहिली श्रद्धांजली; अखेरच्या निरोपासाठी भलीमोठी रांग
2
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"; राज ठाकरेंचे मोदींना पत्र
3
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
4
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
5
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
6
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
7
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
8
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
9
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
10
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
11
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
12
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
13
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
14
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल
15
"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले
16
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
17
Ratan Tata News : 'ही' ठरली रतन टाटांची अखेरची डील, मिळवला होता २३,००० टक्क्यांचा नफा; कोणता होता व्यवहार?
18
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
19
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
20
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण

“२०२४ मध्ये भाजप जाणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले ते सांगावे”: अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 8:10 PM

Akhilesh Yadav: लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी केली असल्याचे सांगत अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर टीका केली.

Akhilesh Yadav: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला पराभूत करण्याचा विरोधकांनी चंग बांधला असून, इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीत सामील असलेले विरोधी पक्ष आपापल्या भागात जोर लावताना दिसत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना २०२४ मध्ये भाजप जाणार असल्याचा मोठा दावा केला आहे. 

सन २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले होते. आता २०२४ मध्ये भाजप सरकार जाणार आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोठी तयारी सुरू आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. आजही जनतेचे प्रश्न तसेच आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का, हे भाजपने सांगावे? सरकारचे म्हणणे आहे की ४० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. आता त्यांची स्थिती काय आहे? किती गुंतवणूक केली आहे? आम्ही ऐकले आहे की ज्या लोकांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती त्यांचा शोध अधिकारी घेत आहेत, असा खोचक टोला अखिलेश यादव यांनी लगावला.

आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बही बनवला नाही

बुंदेलखंडच्या या लोकांना हे समजले की, भाजपने मोठी स्वप्ने दाखवली आहेत. दिल्लीतील लोक आले आणि म्हणाले की, उत्तर प्रदेशात मिसाईल तयार केले जाईल. १० वर्षे मागे वळून पाहिले तर ज्यांनी टँक, बॉम्ब बनवण्याचे आश्वासन दिले होते त्यांनी आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बसुद्धा तयार केला नाही, या शब्दांत अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, सामाजिक न्यायाची लढाई केवळ जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हाच पूर्ण होईल. लोकांना हक्क मिळतील. हा लढा मोठा आहे. मागास आणि दलितांना त्यांचे हक्क द्यावे लागतील. लोकांना सामाजिक न्यायाचा फायदा होईल. आम्ही फक्त पाल, बघेल आणि धनगर समुदायाच्या हितासाठी लढा देणार नाही, परंतु या संदर्भात आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, जेणेकरून लोकांना लोकसंख्येनुसार त्यांचे हक्क दिले जाऊ शकतात, असे अखिलेश यादव म्हणाले. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा