शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 7:09 AM

सनातन रक्षक दलाने केले आंदोलन, आणखी काही मूर्ती हलविण्याची शक्यता

वाराणसी : सनातन रक्षक दल या संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काही मंदिरांतील साईबाबा यांच्या मूर्ती मंगळवारी हटविण्यात आल्या. या संघटनेने बडा गणेश मंदिरातील साईबाबांची मूर्ती तिथून हलवून मंदिराबाहेर आणून ठेवली.

बडा गणेश मंदिराचे मुख्य पुजारी रामू गुरू यांनी सांगितले की, योग्य माहिती नसल्याने साईबाबांच्या मूर्तीची पूजा करण्यात येत होती. ही कृती शास्त्रसंमत नाही. अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी सांगितले की, साईबाबा हे धर्मगुरू, महापुरुष, पीर, अवलिया होऊ शकतात; पण ते देव, ईश्वर असू शकत नाहीत. त्यामुळे वाराणसीच्या मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटविणाऱ्यांना मी धन्यवाद देतो. सनातनी मंडळींनी सर्व मंदिरातून चांदपीर (साईबाबा) यांच्या मूर्ती हटविल्या पाहिजेत, असे मी आवाहन करतो. सनातन दलाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले की, काशी म्हणजे वाराणसीमध्ये फक्त भगवान शंकर या सर्वोच्च देवतेचीच पूजा व्हायला हवी. (वृत्तसंस्था)

भक्तांच्या भावनांचा आदर करून वाराणसीतील दहा मंदिरांतून साईबाबा यांच्या मूर्ती हटविण्यात आल्या. येत्या काही दिवसांत अगस्त्यकुंड, भुतेश्वर मंदिरातील साईबाबा मूर्तीही तिथून हलविण्यात येतील, असे सनातन रक्षक दलाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले.

‘साईबाबा मूर्ती हटविणे ही अयोग्य कृती’ वाराणसी येथील संत रघुवरदास नगर येथील साईबाबा मंदिराचे पुजारी समर घोष यांनी सांगितले की, स्वत:ला आता सनातनी म्हणवून घेणाऱ्या लोकांनीच पूर्वी मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्तींची स्थापना केली होती. आता तेच या मूर्ती हटविण्याचे काम करत आहेत. देव कोणत्याही रूपात दिसू शकतो. त्यामुळे साईबाबांच्या मूर्ती मंदिरांतून हटविणे ही चुकीची कृती आहे. त्यामुळे समाजातील असंख्य भाविकांच्या भावना दुखावतात. 

टॅग्स :saibabaसाईबाबा