शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 13:21 IST

Lok Sabha Elections 2024 : भारताने तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला? तर याचे साधे कारण म्हणजे चांगला हेतू, चांगली धोरणे आणि देशभक्ती, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मिर्झापूर : लोकसभा निवडणुकीसाठी देशात सहा टप्प्यातील मतदान पार पडले असून आता सातवा टप्प्यातील मतदान बाकी आहे. शेवटच्या सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

समाजवादी पार्टी सरकारच्या काळात जनता भयभीत होती, आता भाजपा सरकारमध्ये माफिया थरथरत आहेत. मतदानाच्या सहा टप्प्यांत तिसऱ्यांदा देशात मजबूत भाजपा-एनडीए सरकारचे पक्के झाले. भारताने तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला? तर याचे साधे कारण म्हणजे चांगला हेतू, चांगली धोरणे आणि देशभक्ती, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

5 वर्षात 5 पंतप्रधान होतील, असे समाजवादी पार्टी, काँग्रेस असलेली इंडिया आघाडी सांगत आहे. मात्र, असं कुणी करतं का? कुणी मेकॅनिकही बदलत नाही. हे लोक तर पंतप्रधान बदलायला चालले आहेत. जिथे पंतप्रधान आपली खुर्ची वाचवण्यात व्यस्त असतील, तिथे ते काय काम करणार? बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?  इंडिया आघाडीच्या लोकांना देशातील जनतेने चांगलेच ओळखले आहे. हे लोक जातीयवादी, अतिपरिवारवादी आहेत. जेव्हा जेव्हा त्यांचे सरकार बनते, तेव्हा हे लोक याच आधारावर निर्णय घेतात, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

कायदा आणि सुव्यवस्था आणि समाजवादी पार्टीचा छत्तीसचा आकडा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जे दहशतवादी पकडले गेले त्यांनाही हे समाजवादी पार्टीचे लोक सोडायचे. यात नाराजी दाखवणाऱ्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला समाजवादी पार्टीच्या सरकारने निलंबित केले. त्यांनी संपूर्ण यूपी आणि पूर्वांचलला माफियांचे सुरक्षित आश्रयस्थान बनवले होते. जीवन असो किंवा जमीन, कधी हिसकावून घेतली जाईल हे कोणालाच माहीत नव्हते आणि समाजवादी पार्टी सरकारमध्येही माफियांना व्होट बँकेनुसार पाहण्यात आले होते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

इंडिया आघाडीला एससी-एसटी-ओबीसी आरक्षण लुटायचे आहे - नरेंद्र मोदीआपल्या देशाची पवित्र राज्यघटनाही इंडिया आघाडीच्या निशाण्यावर आहे. त्यांना एससी-एसटी-ओबीसी आरक्षण लुटायचे आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असे आपले संविधान स्पष्टपणे सांगते. 2012 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तेव्हा समाजवादी पार्टीने आपल्या जाहीरनाम्यात दलित आणि मागासवर्गीयांना ज्याप्रमाणे आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे मुस्लिमांनाही आरक्षण दिले जाईल, असे म्हटले होते. यासाठी राज्यघटना बदलू असेही समाजवादी पार्टीने म्हटले होते. पोलीस आणि पीएसीमध्येही मुस्लिमांना 15 टक्के आरक्षण देण्याची घोषणा समाजवादी पार्टीने केली होती. आपली व्होट बँक खूश करण्यासाठी हे लोक एससी-एसटी-ओबीसींचे हक्क कसे हिरावून घेत होते? असे म्हणत नरेंद्र मोदींनी समाजवादी पार्टीवर निशाणा साधला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीmirzapur-pcमिर्जापुर