शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 13:56 IST

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात भाजपाचा सर्वात मोठा पराभव होणार आहे, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. 

देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आतापर्यंत लोकसभेच्या तीन टप्प्यांसाठी मतदान पार पडले आहे. आता बाकीच्या टप्प्यांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे वादळ येत आहे. उत्तर प्रदेशात भाजपाचा सर्वात मोठा पराभव होणार आहे, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. 

उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधाला. ते म्हणाले, "नरेंद्र मोदींनी १० वर्षे अदानी आणि अंबानींचे नाव घेतले नाही, परंतु जेव्हा ते घाबरले तेव्हा त्यांनी त्यांच्या दोन मित्रांची नावे घेतली आणि सांगितले की, या आणि मला वाचवा. इंडिया आघाडीने मला घेरले आहे."

नरेंद्र मोदी यावेळी पंतप्रधान होणार नाहीत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले, "१० ते १५ दिवसात तुम्हाला दिसेल की, तुमची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले जातील, परंतु विचलित होऊ नका. आमचा मुद्दा भारतीय संविधानाचा आहे. या संविधानाने दलित आणि मागासवर्गीयांना अधिकार दिले आहेत."

नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, भाजपाने ठरवले आहे की, ते संविधान रद्द करणार आहेत, पण आम्ही हे होऊ देणार नाही. मतदानासह इतर अधिकारही संविधानानेच दिले आहेत. ही महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. तसेच, नरेंद्र मोदी २२ लोकांसाठी काम करतात, असेही राहुल गांधी म्हणाले. 

याचबरोबर, नरेंद्र मोदींनी या २२ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. नरेंद्र मोदींनी तुमचे किती कर्ज माफ केले आहे? असा सवाल करत हे केंद्र सरकार दलित, मागासवर्गीय, शेतकरी, मजूर यांचे नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४