शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात! घरच्यांचा विरोध पण कोर्टाची परवानगी; प्रीती अन् काजल करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 7:56 PM

दोन मैत्रिणी एकमेकांसोबत सातफेरे घेणार आहेत.

उत्तर प्रदेशातील बिजनोर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील दोन मैत्रिणी एकमेकांसोबत सातफेरे घेणार आहेत. दोन्ही कुटुंबीयांनी समजावून देखील काजल आणि प्रीती त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या. घरच्यांचा विरोध पाहता त्यांनी धाडसी निर्णय घेत घर सोडले. मुलींनी अखेरपर्यंत कोणाचेच न ऐकल्याने कुटुंबीयांना देखील होकार द्यावा लागला. कोर्टाने देखील दोघींना एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे. 

बिजनोर येथील एका गावातील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. येथील प्रीती उत्तराखंड इथे एका फॅक्टरीत काम करायची. तिथेच तिची मैत्री मुरादाबाद येथील काजलसोबत झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी दोन्हीकडील कुटुंबीयांचा विरोध होता. घरच्यांचा वाढता विरोध पाहता प्रीती आणि काजल ५ दिवस घरातून फरार झाल्या. यानंतर प्रीतीच्या वडिलांनी स्थानिक पोलिस स्थानकात काजलविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलींचा शोध घेण्यास सुरूवात केली. गुरूवारी या दोघी पोलिसांच्या पथकाला सापडल्या. पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांना बोलावून त्यांची समजूत काढली. 

मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात!दरम्यान, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर देखील प्रीती आणि काजल या एकत्र राहण्यावर ठाम होत्या. त्या कोणत्याही परिस्थितीत एकमेकांपासून दूर राहण्यास तयार नव्हत्या. जबरदस्ती केल्यास टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना बिजनोर सीजेएम कोर्टात हजर करण्यात आले. जिथे दोघींचे जबाब नोंदवण्यात आले. कोर्टातही प्रीती आणि काजल यांनी एकत्र राहण्यावर ठाम असल्याचे सांगितले. नंतर दोघीही लग्नासाठी पात्र असल्याची खात्री झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची परवानगी दिली. 

प्रीती अन् काजल करणार लग्न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली घरातून निघून गेल्या होत्या. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना सीजेएम न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे कलम १६४ अंतर्गत दोघींचेही जबाब घेण्यात आले. त्या दोघीही एकत्र राहण्यावर ठाम आहेत. त्यावर न्यायालयाने दोघींनाही प्रौढ मानले आणि त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची परवानगी दिली. यानंतर दोन्ही मुली एकत्र निघून गेल्या. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या कुठे गेल्या आहेत हे सांगणे योग्य ठरणार नाही, असेही पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नCourtन्यायालयPoliceपोलिस