शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

साधूचा मोबाईल वाजला! वरुण गांधींनी योगींना टोला हाणला, 'रोखू नका, कधी मुख्यमंत्री होतील नेम नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:07 IST

वरुण गांधी हे गेल्या काही काळापासून भाजपावर नाराज आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते भाजपाला घरचा आहेर देत असतात.

भाजपाचे फायरब्रँड खासदार वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरून जबरदस्त टोला हाणला आहे. वरुण गांधी हे त्यांच्या पीलीभीत मतदारसंघात भाषण देत होते, तेवढ्यात त्यांच्या बाजुला उभ्या असलेल्या एका साधू महाराजांचा फोन वाजला. तेव्हा वरुण यांच्या समर्थकांनी साधूला बोलण्यास सुरुवात केली. यावर वरुण यांनी अरे ओरडू नका, महाराज कधी मुख्यमंत्री बनतील सांगता येत नाही, असे म्हटले. 

वरुण गांधी हे गेल्या काही काळापासून भाजपावर नाराज आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते भाजपाला घरचा आहेर देत असतात. नुकत्याच झालेल्या एका सभेमध्ये त्यांनी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असल्यावरून टोला लगावला आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर, जर हे साधू महाराज मुख्यमंत्री झाले तर आमचे काय होईल, काळाचा वेग समजून घ्या. महाराजजी, मला वाटतं आता चांगला काळ येणार आहे, असे म्हणत वरुण यांनी अच्छे दिनवरही टोला हाणला. 

जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा लोक मला विचारतात की पिलीभीत कसे आहे? पिलीभीतची ओळख माझ्यासोबत आहे. माझी ओळख पिलीभीतशी आहे. हा अतिशय पवित्र संगम आहे. मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा मी तुम्हाला मतदान करण्याची विनंती करतो. कोणासाठीही करा पण लांडग्यांची चाल खेळणाऱ्यांना करू नका, असेही वरुण म्हणाले. 

वरुण गांधी सातत्याने भाजपविरोधात आघाडी उघडत आहेत. सोशल मीडियापासून ते व्यासपीठावर ते सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत. अशा विधानांवरून त्यांच्या आणि भाजपमधील अंतर दिसून येते. त्याचबरोबर त्याची आई मनेका गांधी यांनाही वरुणच्या बचावासाठी अनेकदा यावे लागले आहे. 

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा