शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

...म्हणून अखिलेश यादवांची इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थिती; राहुल गांधींना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 19:39 IST

मुंबईतील ऐतिहासिक अशा शिवाजी पार्कच्या मैदानावर इंडिया आघाडीची सभा होत आहे.

आज मुंबईतील ऐतिहासिक अशा शिवाजी पार्कच्या मैदानावर इंडिया आघाडीची सभा होत आहे. इंडिया आघाडीतील दिग्गज नेते या सभेसाठी उपस्थित आहेत. काँग्रेसची गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली. आज या यात्रेचा बहुचर्चित अशा सभेने समारोप होत आहे. या सभेसाठी देशभरातील इंडिया आघाडीतील प्रमुख नेते मुंबईत आले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील येणार होते. मात्र, ते येऊ न शकल्याने त्यांनी राहुल गांधी यांना पत्राद्वारे संदेश दिला आहे. 

अखिलेश यादव म्हणाले की, आज मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होत आहे. असा प्रवास करू शकणारे फार कमी लोक असतात. राहुल गांधी तुमच्या संकल्पासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. भाजप सरकारच्या अपयशामुळे धगधगत असलेल्या मणिपूरपासून तुम्ही या प्रवासाला सुरुवात केली. ईशान्येतून तुम्ही हुकूमशाही सरकारविरोधात जोरदार संदेश दिला. या संपूर्ण प्रवासात तुम्ही शेतकरी, तरुण, महिला, ज्येष्ठांसह समाजातील प्रत्येक घटकाला भेटला आहात, त्यांच्या समस्या तुम्ही मांडल्या.

तसेच निवडणूक आयोगाने काल निवडणुका जाहीर केल्या, २० मार्चपासून उत्तर प्रदेशमध्ये नामांकन सुरू होत आहे, त्याच तयारीमुळे मी यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही. शेतकरी, तरुण, मागास, दलित आणि महिला विरोधी असलेल्या भाजपला जनता या निवडणुकीत उखडून टाकेल, अशी आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल यातच या यात्रेचे खरे यश असेल, असेही अखिलेश यादव यांनी नमूद केले.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी