शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

हायवेवरील वेगवान ट्रक धाब्यावर घुसला; चौघांचा जागीच मृत्यू, २ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 11:39 IST

इटावा-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने धावणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्यावर जाऊन आदळला

कानपूर - उत्तर प्रदेशात भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. राज्यातील इटावा जिल्ह्यातील कानपूर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकच्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवान धावणाऱ्या या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो ट्रक रस्त्याच्या बाजुला असलेल्या धाब्यावर जाऊन आदळला. त्यामध्ये, ४ जणांना फरफटत नेले, त्यात चौघांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. 

इटावा-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने धावणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्यावर जाऊन आदळला. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी अवनीश कुमार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्य जोमाने सुरू आहे.

शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे एसपी संतोष कुमार यांनी सांगितले. इटावा जिल्ह्याच्या इकदिल परिसरा ही घटना घडली. कानपूरकडून हा ट्रक वेगाने येत होता, जो सर्व्हिस लेनकडे जात होता. त्याचवेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याजवळील धाब्यात घुसला. या दुर्घटनेत इकदिल येथील रहिवाशी सुरज (32), तालिब (30), आग्रा येथील संजय कुमार (35) आणि ढाबा मालक कुलदीप कुमार (35) यांचा ट्रकखाली दबून मृत्यू झाला. तर, फिरोजाबाद येथील सौरभ कुमार आणि इकदिल येथील राहुल कुमार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

 

टॅग्स :Kanpur Policeकानपूर पोलीसAccidentअपघातDeathमृत्यू