शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

कलियुगातील श्रावणबाळ! मुलांनी आई-वडिलांची इच्छा केली पूर्ण, कावडीतून 150 किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 11:52 AM

तीन मुलं आहेत जी या कलियुगात आपल्या आईवडिलांसाठी श्रावणबाळ बनली आहेत.

जगात असे काही लोक आहेत जे आपल्या आई-वडिलांना देवाचा दर्जा देतात आणि अशा लोकांवर देवही प्रसन्न असतो. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये अशी तीन मुलं आहेत जी या कलियुगात आपल्या आईवडिलांसाठी श्रावणबाळ बनली आहेत. तिन्ही मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना खांद्यावर उचलून राजघाटावरून सासनी येथे आणले आहे. सोमवारी सासनी येथील विलेश्‍वर धाम मंदिरात वृद्ध दाम्पत्याने भगवान शंकराला गंगेच्या पाण्याने अभिषेक केला. 

तिन्ही मुलं आपल्या आई-वडिलांना खांद्यावर घेऊन रस्त्याने जात असताना त्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. त्याचवेळी मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटाही त्यांच्यासोबत दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय बदन सिंह बघेल हे पत्नी अनार देवी आणि तीन मुलांसोबत हाथरसच्या हरी नगर कॉलनीत राहतात. 

बदन सिंह नेत्रहिन आहेत. अशा स्थितीत त्यांनी आपल्या मुलांसोबत गंगेत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची तीन मुलं रमेश, विपिन आणि योगेश त्यांच्या वडिलांना रामघाटावर गंगेत स्नान करण्यासाठी घेऊन गेले. आई-वडीलांना गंगेत स्नान करून, कावडमध्ये बांधलेल्या खाटेवर बसवून मुले सासनी नगरातील विलेश्‍वर धाम मंदिराकडे रवाना झाली. मुलांसह त्यांच्या पत्नी आणि मुलंही उपस्थित होती.

तिन्ही मुलांनी आई-वडिलांना खांद्यावर घेऊन सुमारे 150 किलोमीटरवर असलेल्या सासनी परिसरात नेले. त्याचवेळी पोलीसही सक्रिय झाली. त्यानंतर पोलीसही त्यांच्यासोबत फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आज तिन्ही मुलांनी विलेश्वर धाम मंदिरात आपल्या आई-वडिलांकडून अभिषेक केला. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश