शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दुर्घटना; पाण्यात बुडून 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 10:43 AM

मार्कण्डेय  ऋषी मंदिराजवळील तलावात पाच जण बुडाले. हे पाहून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पाण्यात बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढलं तोपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता.

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे गणपती विसर्जनाच्या वेळी मोठी दुर्घटना घडली आहे. मार्कण्डेय ऋषी मंदिराजवळील तलावात पाच जण बुडाले. हे पाहून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पाण्यात बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता. एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सैफई पीजीआयमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील घिरोर शहरातील ऋषी मार्कण्डेय मंदिर परिसरात बांधलेल्या विधूना कुंडात घडली. जिथे गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आलेले पाच जण तलावात बुडाले. हे पाचही जण तलावात अंघोळ करण्यासाठी उतरले होते. मात्र त्यानंतर ही घटना घडली. त्यांना बुडताना पाहून घटनास्थळी एकच गोंधळ झाला.

एका तरुणाला वाचवण्यात यश आले तर 4 जण बुडाले. त्यांना बाहेर काढले, तोपर्यंत त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला सैफई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. आग्रा येथेही अशीच घटना घडली आहे. तर गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मंडी सईद खान येथे राहणारे पाच तरुण बुडाले. यातील दोन तरुणांना वाचवलं मात्र तीन जणांना वाचवता आलं नाही. नंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, यमुनेमध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मंडीतील काही तरुण शाहिद खान टेम्पोने पोईया घाटावर आले होते. मात्र त्यांना पाण्याच्या खोलीची कल्पना नसल्याने ते बुडू लागले. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यावर लोकांच्या लक्षात आलं. कैलास घाट, पोईया घाट, बाळकेश्वर घाट, हाती घाट येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तरुण विसर्जनासाठी दुसऱ्या ठिकाणी पोहोचले जिथे ना पोलीस होते ना कुठली यंत्रणा होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश