शहरं
Join us  
Trending Stories
1
...आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड अन् १० वर्ष कैद; विधानसभेत विधेयक सादर
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल!
3
मंत्र्यांच्या वरदहस्ताने डांबर घोटाळा, बिलातून उकळले कोट्यवधी रुपये; जयंत पाटलांचा आरोप
4
श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा; शेरोशायरी ऐकवत अजित पवारांचे विरोधकांना चिमटे
5
पोलिस ५ महिन्यांपासून गृहकर्जाच्या प्रतीक्षेत; आणखी किती ताटकळणार?
6
सीबीआय तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर; आठ दिवसांचा मुक्काम
7
ब्रिटनमध्ये चार सौ पार...! भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना बसला नाराजीचा मोठा फटका
8
पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात; राज्य सरकारची घोषणा
9
शाहू महाराजांचा दिल्लीतील पुतळा बदलण्याची तयारी; अजित पवारांची विधानसभेत ग्वाही
10
एक कोपरा बहरला, बाकी राज्य करपले; मागास भागातील गरिबीचे निर्मूलन हा संपूर्ण महाराष्ट्राचा कार्यक्रम व्हावा
11
“विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, शंखनाद सभा घेणार”: नाना पटोले
12
CM शिंदेंच्या नातवाशी रंगला रोहित शर्माचा लडिवाळ संवाद... पाहा आजच्या कार्यक्रमाचे Photos
13
या पेनी स्टॉकवर LIC सह अनेक बँका 'फिदा'; 17 दिवसांत दुप्पट केला पैसा! किंमत 5 रुपयांपेक्षाही कमी
14
लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी
15
टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
16
"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 
17
कॅच हातात बसला, आपण आणखी एक वर्ल्डकप जिंकू; सूर्याचे विधानसभेला मराठीतून आश्वासन
18
मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...
19
“ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार
20
'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी यांचा 'वर्षा'वर सत्कार

"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 7:47 PM

हाथरस दुर्घटनेसंदर्भात खुद्द भोले बाबा अर्थात ​​नारायण साकार हरी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भोले बाबा यांनी निवेदन जारी करत, घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावात मगळवारी भोले बाबा यांच्या सतसंगाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 121 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या दुर्घटनेसंदर्भात खुद्द भोले बाबा अर्थात ​​नारायण साकार हरी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भोले बाबा यांनी निवेदन जारी करत, घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. तसेच समाजकंटकांनी ही चेंगराचेंगरी घडवल्याचा दावा करत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

नारायण साकार हरी अर्थात भोले बाबा यांनी आपल्या वकिलामार्फत निवेदन जारी करत म्हटले आहे की, आम्ही मृतांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि परमेश्वराकडे जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो. चेंगराचेंगरीसाठी जबाबदार असलेल्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सरर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील डॉ एपी सिंह यांना नेमन्यात आले आहे. तसेच, आपण 2 जुलैला हाथरसमधील फुलरई येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्संगाच्या कार्यक्रमातून खूप आधीच निघून गेलो होतो, असेही भोले बाबा यांनी म्हटले आहे.

FIR दाखल -हाथरस येथे सत्संगाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोले बाबाचे मुख्य सेवक म्हणून ओळखले जाणारे देवप्रकाश मधुकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम १०५, ११०, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये भोले बाबाचे नावच नाही. पोलिसांच्या कारवाईत भोले बाबाचे नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

 हाथरसच्या सिकंदरराव पोलीस ठाण्यात रात्री १०:१८ मिनिटांनी एफआयआर नोंदवण्यात आला. ब्रजेश पांडे नावाच्या व्यक्तीने एफआयआर दाखल केला आहे. मुख्य सेवेदार देवप्रकाश याच्या विरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, भोले बाबा यांचे नावच एफआयआरमध्ये नसल्याने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोक सेवेदारांच्या मागे जात नाहीत, भोले बाबामुळे लोक तिथे आले. भोले बाबांना मुख्य आरोपी मानले पाहिजे," असे मृतांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

...मात्र कार्यक्रमाच्या दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविक आले -दरम्यान, या कार्यक्रमाची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र आयोजकांकडून केवळ ८० हजार लोक येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविक सत्संगसाठी आले. आयोजकांनी भाविकांची संख्या पोलिसांपासून लपवून ठेवली. मात्र सकाळपासूनच कार्यक्रमाचे सुरु असताना अडीच लाख लोकांची गर्दी पोलिसांना कशी दिसली नाही? असाही सवाल आता उपस्थित होते आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल