शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

तुझं माझं जमेना... राणीने राजावर केले गंभीर आरोप, पण घटस्फोट देण्यास नकार, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 13:54 IST

Raja Bhaiya & Bhanvi Singh Relationship: राजा भैया आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्या नात्यात दुरावा आला असून, त्यांच्या घटस्फोटाबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता एक अजब वळण लागलं आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बाहुबली चेहरा असलेले रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया सध्या त्यांच्या कौटुंबिक जीवनातील घडामोडींमुळे चर्चेत आहेत. राजा भैया आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्या नात्यात दुरावा आला असून, त्यांच्या घटस्फोटाबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता एक अजब वळण लागलं आहे.

उत्तर प्रदेशमधील कुंडा मतदारसंघातून अनेकदा आमदार राहिलेल्या राजा भैया यांच्यावर त्यांची पत्नी भानवी सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या दोघांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. तसेच नेमकं कोण आहे ज्याच्यामुळे या राजा आणि राणीमध्ये वाद झालाय. तसेच एवढे गंभीर आरोप केल्यानंतरही भानवी सिंह यांनी राजा भैय्या यांना घटस्फोट देण्यास का नकार दिलाय, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

राजा भैय्या आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्या घटस्फोटाचं प्रकरण सध्या कोर्टामध्ये आहे. हल्लीच भानवी यांनी घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये दिल्लीच्या साकेत कोर्टामध्ये शपथपत्र दाखल केलं. यामध्ये त्यांनी पती राजा भैय्यावर शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यासह एका महिला पत्रकारासोबत त्यांचं अफेअर सुरू असल्याचाही आरोप केला होता. 

दरम्यान, भानवी सिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माझे पती राजा भैय्या यांनी एका महिला पत्रकारासोबत असलेल्या अफेअरमुळे मला घराबाहेर काढले. एवढंच नाही तर परत सासरी येऊ दिलं नाही. मात्र ते माझे पती आहेत आणि ते माझ्या मुलांचे पिता आहेत. मी त्यांना घटस्फोट देऊ इच्छित नाही. मी त्यांना कधीच घटस्फोट देणार नाही. माझ्या मुलांच्या संरक्षणासाठी मी शक्यतोपरी प्रयत्न करीन.

भानवी सिंह यांनी पुढे सांगितले की, राजा भैय्या यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. पण मी माझं घर का सोडू. तिथे येऊन कुणी अन्य व्यक्ती राहावी, याची मी घटस्फोट का देऊ. मी घटस्फोट देणार नाही. दरम्यान, राजा भैय्या यांच्या घटस्फोट प्रकरणी पुढील सुनावणी ही १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. आता भानवी या घटस्फोट देण्यास तयार नसल्यावरून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. कुणी हा नाते टिकवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणत आहे. तर कुणी वाद सोडवण्याचा प्रयत्न आहे, असं सांगत आहे. मात्र यामागे नेमकं खरं कारण काय हे भानवी सिंहच सांगू शकतात.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपCourtन्यायालयFamilyपरिवार