शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

विवाह, घटस्फोट, जमीनजुमला, वारसासाठी आता समान कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 07:48 IST

उत्तराखंडमध्ये यूसीसी विधेयक विधानसभेत; इतर राज्यांतही अंमलबजावणी

डेहराडून : उत्तराखंड सरकारने बहुचर्चित समान नागरी संहिता विधेयक मंगळवारी राज्य विधानसभेत मांडले. हे स्वातंत्र्यानंतर उचलले गेलेले कोणत्याही राज्यातील पहिलेच पाऊल असून, त्याचे अनुकरण भाजपशासित इतर राज्यांतही केले जाऊ शकते. सर्व नागरिकांसाठी त्यांच्या धर्माचा विचार न करता विवाह, घटस्फोट, जमीनजुमला व वारसा याबाबत समान कायदा हा भाजपच्या अजेंड्यावरील महत्त्वाचा विषय असून, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर याबाबत विधेयक मांडण्यात आले, हे विशेष. गुजरात आणि आसामसारख्या राज्यांतील भाजप सरकारे त्याचा अभ्यास करून अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विधेयक मांडले तेव्हा सत्ताधारी, बाके वाजवून भारत माता की जय, जय श्रीराम अशा घोषणा जोरजोरात देत होते.

काय आहे विधेयकात?बहुपत्नीत्वासारख्या प्रथांवर बंदी. विविध समुदायांना त्यांच्या रीतीरिवाजानुसार विवाह सोहळे आयोजित करता येतील. हे विधेयक संपूर्ण उत्तराखंड आणि राज्याबाहेर राहणाऱ्या उत्तराखंडच्या नागरिकांनाही लागू असेल. राज्यातील आदिवासींना यातून सूट देण्यात आली आहे. या संहितेत समाविष्ट असलेली कोणतीही गोष्ट कोणत्याही अनुसूचित जमातीच्या सदस्यांना लागू होणार नाही,” असे विधेयकात म्हटले आहे. 

चर्चेविना मंजुरीचा सरकारचा प्रयत्न

विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत विरोध केल्याने विधानसभा अध्यक्ष रितू खांडुरी यांनी विधेयकावर चर्चेसाठी अधिक वेळ दिला.­विधेयकाच्या अभ्यासासाठी आम्हाला वेळ हवा असून, त्यानंतर आम्ही त्यावर आमची मते मांडू, असे विरोधी सदस्यांनी सांगितले. सरकारला विधिमंडळ परंपरेचे उल्लंघन करून चर्चेविना हे विधेयक मंजूर करायचे असल्याचे दिसते, अशी टीका विरोधी पक्षनेते यशपाल आर्य यांनी केली. 

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्यास नोंदणी आवश्यकnलिव्ह-इन रिलेशनशिपमधील दोघेही १८ वर्षांखालील नसावेत. तथापि, जर दोघांपैकी कोणीही २१ वर्षांपेक्षा लहान असेल तर, निबंधकांना त्यांच्या पालकांना याबाबत सूचित करणे बंधनकारक आहे. nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्यानंतर दोघांना त्यांच्या नातेसंबंधाबाबत एक महिन्याच्या आत निबंधकांकडे नोंदणी करावी लागेल. अन्यथा एक महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा १०,००० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे. nखोटी माहिती दिल्यास त्यांना दंडाला सामोरे जावे लागेल. जर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या महिलेला तिच्या जोडीदाराने सोडले असेल तर ती त्याच्याकडून पोटगी मिळविण्यासाठी न्यायालयात जाऊ शकते. nविवाहाप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिप संपुष्टात आणण्याचीही तरतूद आहे. तसेच अशा नातेसंबंधातून जन्माला आलेल्या मुलांना कायदेशीर मानले जाईल.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडChief Ministerमुख्यमंत्रीbillबिल