शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मुलाला भेटण्याची ओढ; पत्नीचे दागिने गहाण ठेवून बोगद्याजवळ पोहोचला 'बाप'माणूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:06 IST

वडिलांनी चक्क पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन उत्तरकाशी गाठली.  

डेहरादून - अखेर गेल्या १६ दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज यशस्वी झाली असून उत्तरकाशी येथील बोगद्यातील मजुरांपर्यंत एनडीआरएफ जवानांची टीम पोहोचली आहे. त्यामुळे, काही वेळातच बोगद्या अडकलेले मजूर सुखरुप बाहेर येणार आहेत. या मजुरांच्या स्वागतला राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मान्यवर उपस्थित आहेत. तर, मजुरांचे कुटुंबही त्यांच्या मूळ गावाहून उत्तरकाशी येथील बोगद्याबाहेर आपल्या मुलांची, वडिलांची, भावाची आप्तेष्टांची कासावीस होऊन वाट पाहत आहेत. बोगद्यातील आपल्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी एका वडिलांनी चक्क पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन उत्तरकाशी गाठली.  

बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेकडे गेल्या १७ दिवसांपासून भारतासह अवघ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत. बोगद्यात अडकलेल्या मुजरांचे नेमके काय झाले, ते सुखरुप आहेत का, असे अनेक प्रश्न कुटुंबीयांसह प्रशासन आणि बचाव पथकाला पडले होते. अखेर, एका कॅमेऱ्याद्वारे मजुरांशी संवाद साधल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. त्यानंतर, युद्धपातळीवर या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून एनडीआरएफची टीम तिथपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, काही क्षणातच हे मजुर बोगद्यातून बाहेर येणार आहेत. बाहेर येताच आपल्या कुटुंबीयांना बिलगणार आहेत. कारण, मृत्यूच्या दाढेतून बाहेर येणं ते काय असतं हा थरार त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांना गेल्या १७ दिवसांपासून अनुभवला आहे. 

सर्वजण रोजंदारी मजूर असल्याने अर्थातच त्यांची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे, आपल्या लेकरांना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनीही प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. उत्तरकाशी येथे येण्यासाठी पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन पैसे गोळा केले. ९ हजार रुपये घेऊन मी इथे आलो होतो, आता २९० रुपये शिल्लक राहिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून इथे असल्याने हळू हळू पैसे खर्च होत आहेत, असे म्हणत बोगद्यात अडकलेल्या मजुराच्या वडिलांनी आपली व्यथा माध्यमांसमोर मांडली. 

बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर डेहरादून येथे सर्वांना नेण्यात येणार आहे. तिथे गंगास्नान करुन त्यांना पुढील ठिकाणी पाठवण्यात येईल. आज सकाळपासूनच हलकासा पाऊस पडत आहे. सर्व मजूर बाहेर येत असताना देवानेही आशीर्वाद दिल्याचा हा शुभशकून आहे. बोगद्यातून आमचा मुलगा बाहेर येईल आणि आमच्या जीवात जीव येईल, असे म्हणत मजुराच्या वडिलांनी मुलगा सुखरुप परत येत असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, मुलाला वापर नेण्यासाठी त्याचे कपडे आणि आवश्यक सामानही घरुन आणलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

कुटुंबीय बोगद्याबाहेर, सर्वांचाच जीव भांड्यात पडला

बोगद्यात खोदाई संपली असून अडकलेल्य़ा ४१ मजुरांपर्यंत ८०० मीमी व्यासाचा पाईप टाकण्यात आले आहेत. या पाईपमधून एनडीआरएफची टीम मजुरांपर्यंत पोहोचली आहे. बोगद्यामध्ये अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना देखील बोलविण्यात आले आहे. सर्वच्या सर्व ४१ मजूर ठीक असावेत अशी प्रार्थना केली जात आहे. रेस्क्यू टीमने मजुरांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहेत.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडLabourकामगारFamilyपरिवारRainपाऊसNational Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल