शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
3
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
4
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
5
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
6
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
7
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
8
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
9
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
10
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
11
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
12
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
13
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
14
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
15
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
16
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
17
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
18
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
19
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
20
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

वर्षभरात वीज चोरीचे १ हजार २२५ धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची वीज चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:34 IST

Wardha : मीटर घेऊनच विजेचा वापर करावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात महावितरणने केलेल्या धडक कारवाईत गेल्या १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात वीज चोरीचे तब्बल १ हजार २२५ गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या चोरीमुळे महावितरणला १ कोटी ९३ लाख ११ हजार रुपयांच्या १ लाख ३३ हजार ४८९ युनिट विजेचे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त, प्रत्यक्ष गरजेव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्षपणे वीज वापरणाऱ्या ६० ग्राहकांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. 

महावितरणने वीज चोरीविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतलेल्या या कारवाईमध्ये वर्धा जिल्ह्यातील १ हजार २२५ वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना चोरीच्या बिलासह दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी १ हजार २१३ ग्राहकांकडून तडजोडीपोटी ३८ लाख १४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, वीज चोरी करणाऱ्यांमध्ये तारांवर आकडा टाकून वीज चोरणाऱ्या ३६५ ग्राहकांचा समावेश आहे, तर ८६० ग्राहकांनी थेट मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटर बंद पाडणे, रिमोट कंट्रोलने मीटर दुरून बंद करणे, मीटरमध्ये छिद्र पाडून रोध निर्माण करणे किंवा मीटरची गती कमी करणे यासारख्या गैरमार्गाचा अवलंब करून वीज चोरली आहे. यासोबतच, अधिक धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्ष वापराव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्ष वीज वापरणाऱ्या ६० ग्राहकांनी ३ हजार ५८७ युनिट विजेचा अनधिकृत वापर केला, ज्यासाठी त्यांना ७ लाख ८० हजार रुपयांचे देयक आकारण्यात आले आहे.

वीज चोरीसाठी वापरल्या नवनवीन क्लृप्त्यामोहिमेदरम्यान एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षाच्या काळात उघडकीस आलेल्या वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये चोरांनी अवलंबलेल्या क्लृप्त्या पाहून अधिकारीही चक्रावून गेले. यात मीटरमध्ये अत्यंत चलाखीने फेरबदल करणे, ते पूर्णपणे बंद पाडणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रिमोटने मीटर बंद करणे, तसेच मीटरच्या मागील बाजूस छिद्र पाडून त्यात अडथळा निर्माण करून मीटरची गती कमी करणे यासारख्या नवनवीन पद्धतींचा वापर उघडकीस आला आहे.

मीटर घेऊनच विजेचा वापर करावावीज चोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे वीजवाहिन्या आणि रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येतो. यामुळे रोहित्र निकामी होणे, शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होणे यासारख्या समस्या उद्भवतात. याचा नाहक त्रास नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना सहन करावा लागतो आणि महावितरणलाही मोठा आर्थिक फटका बसतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे, सर्व नागरिकांनी अधिकृत वीज मीटर घेऊनच विजेचा वापर करावा आणि वापरलेल्या विजेच्या बिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष तपासणीला सुरुवातवीज चोरांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. याअंतर्गत, सदोष मीटर, तसेच सरासरी वीज बिल असलेल्या सर्वच ग्राहकांच्या मीटरची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासोबतच, थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले आणि सवलत देऊनही अभय योजनेत सहभागी न झालेल्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा सर्व ग्राहकांच्या प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :electricityवीजMONEYपैसाbillबिलwardha-acवर्धा