शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

१५० नागरिकांना घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:35 IST

मानसी फायनान्स या कंपनीकडून लाख रूपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १५० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आली आहे. सदर व्यक्तींकडून प्रत्येकी ६ हजार रुपये उकळून त्यांना एकूण नऊ लाखांनी गंडा घालण्यात आला असून त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलिसात तक्रार : फायनान्सच्या नावाखाली नऊ लाखांची अफरातफर

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : मानसी फायनान्स या कंपनीकडून लाख रूपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १५० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आली आहे. सदर व्यक्तींकडून प्रत्येकी ६ हजार रुपये उकळून त्यांना एकूण नऊ लाखांनी गंडा घालण्यात आला असून त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, अंतोरा येथील रविंद्र प्रांजळे, गणेश कुरवाडे चिंचोली या दोघा एजंटनी मानसी फायनान्स कन्सल्टन्सी प्रा. लि. न्यू लक्ष्मीनगर कॉलनी नं. २ जय प्लाझा सर्कीट हाऊस रोड गोरेगाव वेस्ट मुंबई या नावाने कंपनी तयार केली. याचे पत्रक छापून ग्रामीण भागात वाटण्यात आली.यामध्ये विमा खर्च, प्रोसेसींग फी, कागदपत्र रजिस्टर्ड यासाठी सहा हजार रूपये देऊन एक लाख कर्ज मिळते, असे सांगितल्यावर लोकांनी त्यावर विश्वास करून पैसे देणे सुरू केले. लहान आर्वी ३५, देलवाडी २०, अंतोरा १५, खंबीत १६, अंबिकापूर १०, चिंचोली ४, किन्हाळा ५, जोलवाडी ७, बेलोरा १३, माणिकनगर ६ आणि इतर गावात २० असे एकूण १५० लोकांजवळून यामध्ये महिला बचत गट सदस्य, गावातील नागरीक यांच्याकडून प्रत्येकी सहा हजार रुपये गोळा करण्यात आले. त्याच्या पावत्या या दोन्ही एजंटनी दिल्या नाही. सर्व लोकांना २ नोव्हेंबर २०१८ ला प्रत्येकी १ लाख कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजवरी १७ वेळा तारीख पे तारीख देत मोठ्या प्रमाणात बनवेगिरी करण्यात आली. शेवटी लोकांनी प्रांजळे व कुरवाडे या दोघांना ६ हजार परत देण्याची मागणी केली असता त्यांनी पळून गेलो का, कंपनीने फसविले असे म्हणत पैसे देणाऱ्यांच्या अडचणीतच भर टाकली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देलवाडीचे राजेंद्र कोहळे, लहानआर्वीचे विलास गुंबळे व आदींनी आष्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.आष्टी (शहीद)चे ठाणेदार जितेंद्र चांदे यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून याप्रकरणी आर्थीक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात अशा अनेक फायनान्स कंपन्यांनी जाळा पसरविले असून त्यांच्याकडून होणाºया आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनीही कुणालाही असे पैसे देवू नयेत, असे पोलिसांनी केले आहे.मानसी फायनान्स या कंपनीकडून १ लाख कर्ज देतो असे सांगितल्यावर आम्ही त्यावर विश्वास ठेवून प्रत्येकी ६ हजार रूपये दिले होते. मात्र, ४ महिने लोटूनही कर्ज दिले नाही. आमची फसवणूकच झाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.- राजेंद्र कोहळे, देलवाडी.सदर प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल.- जितेंद्र चांदे, ठाणेदार, आष्टी (शहीद).

टॅग्स :fraudधोकेबाजी