शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

एसटीच्या 157 बसगाड्यांनी अर्ध्या रस्त्यात सोडली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 5:00 AM

जिल्ह्यातील दुर्दशीत रस्त्यामुळे एसटीला टायर पंक्चर होणे, सुट्याभागांचे नुकसान होणे आदींचा नेहमीच फटका बसतो. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे याशिवाय  इलेक्ट्रिकल अडचणींमुळे एसटी मध्येच नादुरुस्त होतात. यात बहुतांशवेळी प्रवाशांना धक्का मारावा लागतो. एखाद्या प्रवाशाला नियोजितस्थळी तातडीने जावयाचे असल्यास त्याच्याकडून अशावेळी संताप व्यक्त होतो.

ठळक मुद्देमेंटेनन्सवर कोटींचा खर्च : तोट्यात असलेल्या महामंडळाला परवडेना

सुहास घनोकार लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एसटी बसच्या देखभालीवर वर्षाकाठी कोटी रुपयाचा खर्च होत असला तरी त्या मध्येच नादुरुस्त होण्याचा अनुभव प्रवाशांना सातत्याने येत असतो. यामुळे प्रवासी परिवहन महामंडळाप्रती वैताग व्यक्त करताना दिसतात.  जिल्ह्यात मागील वर्षभरात बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर तब्बल १५७ बसेस पडल्या.  जिल्ह्यातील दुर्दशीत रस्त्यामुळे एसटीला टायर पंक्चर होणे, सुट्याभागांचे नुकसान होणे आदींचा नेहमीच फटका बसतो. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे याशिवाय  इलेक्ट्रिकल अडचणींमुळे एसटी मध्येच नादुरुस्त होतात. यात बहुतांशवेळी प्रवाशांना धक्का मारावा लागतो. एखाद्या प्रवाशाला नियोजितस्थळी तातडीने जावयाचे असल्यास त्याच्याकडून अशावेळी संताप व्यक्त होतो.वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, पुलगाव, तळेगाव (श्यामजी पंत) आदी पाच आगार आहेत. हे पाचही आगार मिळून एकूण २२८ बसगाड्या आहेत. संपूर्ण विभागात एकूण १५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. एसटीच्या दररोज ३४० ते २५० किलोमीटर फेऱ्या होतात. कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात तब्बल सात ते आठ महिने एसटीची चाके जागीच रुतली. त्यामुळे एसटीच्या देखभालीवरील खर्चाचे प्रमाण यंदा कमी राहिले. सध्या एसटी पूर्णक्षमतेने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि जिल्हाबाहेर धावत असून, एसटी रस्त्यात मधेच बंद पडण्याचे प्रमाण सध्या तरी आढळून आले नाही.रस्त्यात एसटी बस बंद पडण्याची कारणे एसटी बसच्या देखभालीवर कोटीचा खर्च होत असला तरी गाड्यांमध्ये क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे, टायर पंक्चर होणे याशिवाय इलेक्ट्रिकल अडचणी आल्यास रस्त्यात मध्येच एसटी बस बंद पडतात. मात्र हे प्रमाण आता कमी झाले आहे.

दहा वर्षांवरील ९० बसेसवर्धा विभागांतर्गत वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजी पंत), पुलगाव आदी पाच आगार असून, एकूण २२८ बसगाड्या आहेत.  उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार १५ वर्षांपर्यंत बस वापरता येते. मात्र, वर्धा विभागांतर्गत साधारणत: ८ ते १० वर्षांपर्यंतच बसगाडीचा वापर केला जातो. १२ वर्षांनंतर बस स्क्रॅपमध्ये काढली जाते अथवा या गाड्यांचे रूपांतर मालवाहतूक गाडीत केले जाते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता वर्धा विभागाकडून सुस्थितीतील बसेस उपयोगात आणल्या जातात. तसेच बस गाड्यांच्या मेन्टेन्स कडेही लक्ष विशेष लक्ष दिले जाते, असे आगारातील सुत्रांकडून सांगण्यात आले. 

एसटीच्या देखभालीसाठी मोठा खर्च होतो. तो महामंडळाला परवडत नसला तरी प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तो करावाच लागतो. सद्यस्थितीत आगारातील बसगाड्यांची स्थिती उत्तम आहे. बसगाड्या रस्त्यात मधेच बंद पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.पल्लवी चोकट, आगारप्रमुख, वर्धा. 

 

टॅग्स :state transportएसटी